शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सवलती

By admin | Updated: March 19, 2017 01:41 IST

राज्यातील ३१ लाख शेतकऱ्यांकडे कर्जाची थकबाकी असली तरी एक कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कर्जफेड वेळेत केलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना

मुंबई - राज्यातील ३१ लाख शेतकऱ्यांकडे कर्जाची थकबाकी असली तरी एक कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कर्जफेड वेळेत केलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना सवलती देताना या दोघांनाही त्या देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने काल नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन कर्जमाफी व इतर सवलतींसाठी साकडे घातले होते. त्या विषयीचे निवेदन विरोधकांच्या गदारोळातच मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत केले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार जी योजना तयार करेल त्यात राज्य सरकारदेखील आर्थिक भार निश्चितपणे उचलेल. ३१ लाख शेतकऱ्यांकडे ३० हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज थकित आहे पण एकूण शेतकरी खातेदारांची संख्या १ कोटी ३४ लाख इतकी आहे. याचा अर्थ एक कोटींपेक्षा जास्त शेतकरी वेळेत कर्ज परतफेड करीत आहेत. ज्यांनी कर्ज वेळेत भरले त्यांना सवलती दिल्या नाहीत आणि कर्ज न भरणाऱ्यांना त्या दिल्या तर भविष्यात कर्ज न भरण्याची प्रवृत्ती बळावेल. त्यामुळे सवलती देताना दोघांमध्ये भेद केला जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आज सभागृहात जे गोंधळ घालत आहेत त्यांच्यामुळे शेतकऱ्यांची गेल्या १५ वर्षांत वाईट अवस्था झाली होती. आज केवळ घोषणाबाजी करून ते शेतकऱ्यांचे कैवारी ठरू शकत नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी सुनावले. (विशेष प्रतिनिधी)