शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

अभियांत्रिकी महाविद्यालयांना प्रवेशाची चिंता

By admin | Updated: January 10, 2016 01:03 IST

बारावीच्या परीक्षेला अद्याप दीड महिन्याचा अवकाश असताना राज्यातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मात्र बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. प्रवेश कसे वाढतील, या मुद्यावरच

- योगेश पांडे,  नागपूरबारावीच्या परीक्षेला अद्याप दीड महिन्याचा अवकाश असताना राज्यातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मात्र बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. प्रवेश कसे वाढतील, या मुद्यावरच या बैठकांमध्ये भर देण्यात येत आहे. दर वर्षी वाढणाऱ्या रिक्त जागांच्या प्रमाणामुळे राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळेच परीक्षांच्या अगोदरच ‘मार्केटिंग’ कसे करता येईल या संदर्भात चाचपणी सुरू आहे.राज्यातील ३६७ अभियांत्रिकी महाविद्यालयांत १ लाख ५३ हजार ८६७ जागा आहेत. २०१५-१६ या वर्षात यापैकी ६४ हजार ६३५ म्हणजेच सुमारे ४२ टक्के जागा रिक्त होत्या. अगदी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत देखील जागा रिक्त होत्या. प्रवेशच नसल्यामुळे अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांची स्थिती अडचणीची झाली आहे. याचा फटका तेथील प्राध्यापकांनादेखील बसत असून, अनेक ठिकाणी तर ६-६ महिने वेतन मिळालेले नाही. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) अंतर्गत विद्यार्थी नामवंत महाविद्यालयांनाच जास्त प्राधान्य देतात. हीच बाब लक्षात घेता व्यवस्थापन ‘कोटा’मधून मिळतील तितके प्रवेश करण्याचा महाविद्यालयांचा प्रयत्न असतो.बाहेरील राज्यांकडूनदेखील निराशागेल्या काही वर्षांपासून महाविद्यालयांचे प्राध्यापक व प्रतिनिधी विद्यार्थी शोधण्यासाठी चक्क बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर व पंजाब या राज्यांकडे धाव घेताना दिसून आले. विविध ‘आॅफर्स’ देऊनही मागील वर्षी हवा तसा प्रतिसाद लाभला नव्हता. त्यामुळे काही महाविद्यालयांनी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या शिकवणी वर्गांच्या चालकांशीच संपर्क साधला आहे.विदर्भ, मराठवाड्याला फटकामुंबई, पुण्याकडील महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकडे राज्यातील विद्यार्थ्यांचा कल असतो. याचा फटका विदर्भ व मराठवाड्यातील महाविद्यालयांना बसताना दिसून येतो. गेल्या काही वर्षांत ‘बेसिक सायन्स’कडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे सोबतच महाविद्यालयांच्या दर्जाचादेखील प्रश्न आहेच. या विविध कारणांमुळे रिक्त जागांचे प्रमाण वाढीस लागले आहे, असे मत तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी व्यक्त केले. ४२ टक्के जागा रिक्तराज्यातील ३६७ अभियांत्रिकी महाविद्यालयांत १ लाख ५३ हजार ८६७ जागा आहेत. २०१५-१६ या वर्षात यापैकी ६४ हजार ६३५ म्हणजेच सुमारे ४२ टक्के जागा रिक्त होत्या. अगदी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत देखील जागा रिक्त होत्या. राज्यातील अभियांत्रिकी प्रवेशाची स्थितीवर्षजागारिक्त जागा२०१०-१११,१४,२६८२०,८४०२०११-१२१,३४,०२४३०,७१५२०१२-१३१,४८,२९४४१,६०३२०१३-१४१,५४,८२७५२,४००२०१४-१५१,६३,०००६४,००० (सुमारे)२०१५-१६१,५३,८६७६४, ६२५