शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी महाविद्यालयांना प्रवेशाची चिंता

By admin | Updated: January 10, 2016 01:03 IST

बारावीच्या परीक्षेला अद्याप दीड महिन्याचा अवकाश असताना राज्यातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मात्र बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. प्रवेश कसे वाढतील, या मुद्यावरच

- योगेश पांडे,  नागपूरबारावीच्या परीक्षेला अद्याप दीड महिन्याचा अवकाश असताना राज्यातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मात्र बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. प्रवेश कसे वाढतील, या मुद्यावरच या बैठकांमध्ये भर देण्यात येत आहे. दर वर्षी वाढणाऱ्या रिक्त जागांच्या प्रमाणामुळे राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळेच परीक्षांच्या अगोदरच ‘मार्केटिंग’ कसे करता येईल या संदर्भात चाचपणी सुरू आहे.राज्यातील ३६७ अभियांत्रिकी महाविद्यालयांत १ लाख ५३ हजार ८६७ जागा आहेत. २०१५-१६ या वर्षात यापैकी ६४ हजार ६३५ म्हणजेच सुमारे ४२ टक्के जागा रिक्त होत्या. अगदी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत देखील जागा रिक्त होत्या. प्रवेशच नसल्यामुळे अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांची स्थिती अडचणीची झाली आहे. याचा फटका तेथील प्राध्यापकांनादेखील बसत असून, अनेक ठिकाणी तर ६-६ महिने वेतन मिळालेले नाही. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) अंतर्गत विद्यार्थी नामवंत महाविद्यालयांनाच जास्त प्राधान्य देतात. हीच बाब लक्षात घेता व्यवस्थापन ‘कोटा’मधून मिळतील तितके प्रवेश करण्याचा महाविद्यालयांचा प्रयत्न असतो.बाहेरील राज्यांकडूनदेखील निराशागेल्या काही वर्षांपासून महाविद्यालयांचे प्राध्यापक व प्रतिनिधी विद्यार्थी शोधण्यासाठी चक्क बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर व पंजाब या राज्यांकडे धाव घेताना दिसून आले. विविध ‘आॅफर्स’ देऊनही मागील वर्षी हवा तसा प्रतिसाद लाभला नव्हता. त्यामुळे काही महाविद्यालयांनी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या शिकवणी वर्गांच्या चालकांशीच संपर्क साधला आहे.विदर्भ, मराठवाड्याला फटकामुंबई, पुण्याकडील महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकडे राज्यातील विद्यार्थ्यांचा कल असतो. याचा फटका विदर्भ व मराठवाड्यातील महाविद्यालयांना बसताना दिसून येतो. गेल्या काही वर्षांत ‘बेसिक सायन्स’कडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे सोबतच महाविद्यालयांच्या दर्जाचादेखील प्रश्न आहेच. या विविध कारणांमुळे रिक्त जागांचे प्रमाण वाढीस लागले आहे, असे मत तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी व्यक्त केले. ४२ टक्के जागा रिक्तराज्यातील ३६७ अभियांत्रिकी महाविद्यालयांत १ लाख ५३ हजार ८६७ जागा आहेत. २०१५-१६ या वर्षात यापैकी ६४ हजार ६३५ म्हणजेच सुमारे ४२ टक्के जागा रिक्त होत्या. अगदी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत देखील जागा रिक्त होत्या. राज्यातील अभियांत्रिकी प्रवेशाची स्थितीवर्षजागारिक्त जागा२०१०-१११,१४,२६८२०,८४०२०११-१२१,३४,०२४३०,७१५२०१२-१३१,४८,२९४४१,६०३२०१३-१४१,५४,८२७५२,४००२०१४-१५१,६३,०००६४,००० (सुमारे)२०१५-१६१,५३,८६७६४, ६२५