शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

सर्वसमावेशक धोरण आखण्याची सूचना

By admin | Updated: February 13, 2016 01:54 IST

राज्यातील जे समुद्रकिनारे पर्यटनस्थळे आहेत, अशा समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्वसमावेशक धोरण आखा, अशी सूचना उच्च न्यायालयाने शुक्रवारी सरकारला केली.

मुंबई : राज्यातील जे समुद्रकिनारे पर्यटनस्थळे आहेत, अशा समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्वसमावेशक धोरण आखा, अशी सूचना उच्च न्यायालयाने शुक्रवारी सरकारला केली.मुरूड येथे १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी जनहित मंच या एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती.गेल्या सुनावणीच्या वेळी खंडपीठाने राज्य सरकारला मार्च २००६च्या अधिसूचनेवर अंमलबजावणी न केल्याबद्दल धारेवर धरले होते. सुरक्षेचे उपाय आखल्यास पर्यटनाला वाव मिळेल. पर्यटन स्थळांच्या सुरक्षिततेसंदर्भात तुम्ही (सरकार) सर्वसमावेशक धोरण आखावे. त्यासाठी स्थानिक पंचायत, पोलीस आणि टुरिस्ट कंपन्यांचे मत विचारात घ्यावे,’ असे खंडपीठाने गोव्याचे उदाहरण देत म्हटले.‘पर्यटकांना समुद्र किती खोल आहे, याची कल्पना नसते. त्यामुळे तुम्ही त्यांना ही माहिती द्या. टॉवर, लाईट, लाइफ जॅकेट याव्यतिरिक्त प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर समुद्रात किती आत जाणे सुरक्षित आहे याच्या सूचना लावा,’ अशी सूचनाही खंडपीठाने सरकारला केली.२००६च्या अधिसूचनेनुसार, देखरेख कक्ष असणे आवश्यक आहे, असे खंडपीठाने म्हटले. ‘सगळ्या गोष्टी कागदावरच आहेत. अंमलबजावणी होत नाही’ असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. ‘पर्यटकांच्या संरक्षणासाठी सरकार सर्वसमावेशक धोरण आखेल, अशी आशा आम्ही बाळगतो,’ असे म्हणत खंडपीठाने सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली. (प्रतिनिधी)