शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

दोन वर्षांत अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार - गिरीश महाजन

By admin | Updated: August 31, 2016 17:25 IST

जलसंपदा विभागात एकही नवीन काम काढणार नसून येत्या दोन वर्षात अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 31 - जलसंपदा विभागात एकही नवीन काम काढणार नसून येत्या दोन वर्षांत अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
जलसंपदा विभागात प्रचंड अनियमितता आहे. हे सारे मागच्या सरकारचे पाप असून या खात्यामुळेच सरकार बदलले आहे, असा आरोप करत गिरीश महाजन यांनी येत्या दोन वर्षांत अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली आहे.
राज्यातील धरणं केव्हाही फुटू शकतील, अशी परिस्थिती नाही. टेमघर धरणाला गळती लागली असून, त्याची चौकशी सुरू आहे. टेमघरसाठी शंभर कोटींचं टेंडर काढलंय, पुढच्या महिन्यात दुरुस्तीला सुरुवात होऊन गळती थांबेल, सरकार याबाबत गंभीर आहे. टेमघरची परिस्थिती गंभीर आहे. ज्यांनी चुका केल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तर दुसऱ्या धरणांतील गळती अतिशय छोटी आहे. गेल्या 6 महिन्यांपासून काम सुरू असून पावसामुळे काम थांबविण्यात आले आहे. पावसानंतर काम सुरू करून गळती थांबवली जाईल, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले. 
गोसेखुर्दच्या प्रकल्पात अनियमितता आढळल्यानं निविदा रद्द केली आहे. तसेच यासंदर्भात एसीबीकडून चौकशी सुरू आहे. कोकणातील बारा, नाशिकचा किकवी यांच्या कामात गंभीर अनियमितता आहे. कोकणात बारा पैकी दोन प्रकल्पांची चौकशी झाली आहे. अधिका-याला अटक झाली असून, ठेकेदार जेल मध्ये आहे. शेवटचं आरोपपत्र दाखल करण्याचे काम सुरू असून इतर दोषींवरही कारवाई करण्यात येईल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. 
राज्यातील धरणसाठ्यांची परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा उत्तम आहे. तर मराठवाडय़ासह काही भागात पाऊस कमी असून जायकवाडीत चांगले पाणी आहे. सध्या जायकवाडीत ७६ टीएमसी पाणी आहे. सदर भागातील पीकही अनुकूल आहेत,  असे गिरीश महाजन यांनी सांगितले.