शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

दोन वर्षांत अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार - गिरीश महाजन

By admin | Updated: August 31, 2016 17:25 IST

जलसंपदा विभागात एकही नवीन काम काढणार नसून येत्या दोन वर्षात अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 31 - जलसंपदा विभागात एकही नवीन काम काढणार नसून येत्या दोन वर्षांत अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
जलसंपदा विभागात प्रचंड अनियमितता आहे. हे सारे मागच्या सरकारचे पाप असून या खात्यामुळेच सरकार बदलले आहे, असा आरोप करत गिरीश महाजन यांनी येत्या दोन वर्षांत अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली आहे.
राज्यातील धरणं केव्हाही फुटू शकतील, अशी परिस्थिती नाही. टेमघर धरणाला गळती लागली असून, त्याची चौकशी सुरू आहे. टेमघरसाठी शंभर कोटींचं टेंडर काढलंय, पुढच्या महिन्यात दुरुस्तीला सुरुवात होऊन गळती थांबेल, सरकार याबाबत गंभीर आहे. टेमघरची परिस्थिती गंभीर आहे. ज्यांनी चुका केल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तर दुसऱ्या धरणांतील गळती अतिशय छोटी आहे. गेल्या 6 महिन्यांपासून काम सुरू असून पावसामुळे काम थांबविण्यात आले आहे. पावसानंतर काम सुरू करून गळती थांबवली जाईल, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले. 
गोसेखुर्दच्या प्रकल्पात अनियमितता आढळल्यानं निविदा रद्द केली आहे. तसेच यासंदर्भात एसीबीकडून चौकशी सुरू आहे. कोकणातील बारा, नाशिकचा किकवी यांच्या कामात गंभीर अनियमितता आहे. कोकणात बारा पैकी दोन प्रकल्पांची चौकशी झाली आहे. अधिका-याला अटक झाली असून, ठेकेदार जेल मध्ये आहे. शेवटचं आरोपपत्र दाखल करण्याचे काम सुरू असून इतर दोषींवरही कारवाई करण्यात येईल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. 
राज्यातील धरणसाठ्यांची परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा उत्तम आहे. तर मराठवाडय़ासह काही भागात पाऊस कमी असून जायकवाडीत चांगले पाणी आहे. सध्या जायकवाडीत ७६ टीएमसी पाणी आहे. सदर भागातील पीकही अनुकूल आहेत,  असे गिरीश महाजन यांनी सांगितले.