शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

संपूर्ण कर्जमाफीसाठी सेवाग्राम आश्रमासमोर शेतकऱ्यांचे महात्म्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2017 18:08 IST

केंद्र व राज्य सरकार शेतकरीहितार्थ अनेक योजना राबवित असले तरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येसारखा कठोर निर्णय शेतकरी घेत आहे.

ऑनलाइन लोकमतवर्धा, दि. 30 - केंद्र व राज्य सरकार शेतकरीहितार्थ अनेक योजना राबवित असले तरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येसारखा कठोर निर्णय शेतकरी घेत आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होत आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्यावी, अशी मागणी वेळोवेळी करीत अनेक आंदोलने करण्यात आली. आंदोलनादरम्यान संबंधितांना निवेदनेही देण्यात आली. परंतु या मागणीवर कुठलीही ठोस भूमिका केंद्र आणि राज्य सरकारने घेतली नसल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांवरील संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी सोमवारी सेवाग्राम आश्रमासमोर शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे महात्म्यांना साकडे आंदोलन करण्यात आले.शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण उत्थानासाठी शेतकरी नेते शरद जोशी प्रेणीत भारत उत्थान कार्यक्रम अंमलात आणण्यात यावा, जमीन धारणा कायदा व सिलिंग कायदा, आवश्यक वस्तूंचा कायदा, सक्तीचा जमीन अधिग्रहण कायदा रद्द करण्यात यावा, शेतीसंबंधी बाजार व प्रक्रियेतील सर्व अडथळे काढून शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्यातील हस्तक्षेप संपविण्यात यावे, ग्रामीण क्षेत्रासाठी रस्ते, वीज, पाणी साठवणूक आणि प्रक्रिया वाहतूक, विपणन, माहिती तंत्रज्ञान व प्रयोगशाळा आदी आवश्यक संरचना निर्माण करण्यात याव्या, विदेशातून आयात होत असलेल्या शेतमालावर बंदी घालण्यात यावी, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला पूर्ण दाबाची २४ तास वीज देण्यात यावी, शेतकऱ्यांवर थकीत असलेले विद्युत देयक तसेच कर्ज पूर्णपणे माफ करण्यात यावे, वाढती बेरोजगारी लक्षात घेता ग्रामीण युवकांसाठी शेती व्यावसायातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी शेतीमध्येच भांडवलनिर्मिती होऊ शकेल असे शेती अनुकूल धोरण आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे विविध पक्षातील  राजकीय पुढारी व सत्ताधारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन सेवाग्राम आश्रमात सादर केले. सदर आदोलनाचे नेतृत्त्व शेतकरी संघटनेच्या माजी आमदार सरोज काशीकर, अनिल घनवट, जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, माजी खासदार भुपेंद्रसिंग मान, शैलजा देशपांडे, गीता खांदेभराड, सतीश दाणी यांनी केले. आंदोलनात शेकडो महिला व पुरुष शेतकऱ्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्रातील शेतकरी झाले सहभागीशेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत बापू कुटी समोर शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात सोमवारी शेतकऱ्यांचे महात्म्यांना साकडे हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सांगली, सातारा व सोलापूर हे तीन जिल्हे वगळता वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदीया यासह महाराष्ट्रातील जळगाव, परभणी आदी जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी भजन करून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला.सरकारला जागविण्यासाठी काढणार रॅलीसरकारला जागविण्यासाठी सेवाग्राम येथून आंदोलनाची सुरूवात करण्यात आली आहे. १ आणि २ रोजी राज्य कार्यकारिणीची बैठक होईल. त्यात जिल्हा पातळीवरील आंदोलनांची घोषणा होईल. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सेवाग्राम ते साबरमती रॅली काढण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी सदर आंदोलनादरम्यान लोकमतशी बोलताना सांगितले.