शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

संपूर्ण कर्जमाफीसाठी सेवाग्राम आश्रमासमोर शेतकऱ्यांचे महात्म्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2017 18:08 IST

केंद्र व राज्य सरकार शेतकरीहितार्थ अनेक योजना राबवित असले तरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येसारखा कठोर निर्णय शेतकरी घेत आहे.

ऑनलाइन लोकमतवर्धा, दि. 30 - केंद्र व राज्य सरकार शेतकरीहितार्थ अनेक योजना राबवित असले तरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येसारखा कठोर निर्णय शेतकरी घेत आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होत आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्यावी, अशी मागणी वेळोवेळी करीत अनेक आंदोलने करण्यात आली. आंदोलनादरम्यान संबंधितांना निवेदनेही देण्यात आली. परंतु या मागणीवर कुठलीही ठोस भूमिका केंद्र आणि राज्य सरकारने घेतली नसल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांवरील संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी सोमवारी सेवाग्राम आश्रमासमोर शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे महात्म्यांना साकडे आंदोलन करण्यात आले.शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण उत्थानासाठी शेतकरी नेते शरद जोशी प्रेणीत भारत उत्थान कार्यक्रम अंमलात आणण्यात यावा, जमीन धारणा कायदा व सिलिंग कायदा, आवश्यक वस्तूंचा कायदा, सक्तीचा जमीन अधिग्रहण कायदा रद्द करण्यात यावा, शेतीसंबंधी बाजार व प्रक्रियेतील सर्व अडथळे काढून शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्यातील हस्तक्षेप संपविण्यात यावे, ग्रामीण क्षेत्रासाठी रस्ते, वीज, पाणी साठवणूक आणि प्रक्रिया वाहतूक, विपणन, माहिती तंत्रज्ञान व प्रयोगशाळा आदी आवश्यक संरचना निर्माण करण्यात याव्या, विदेशातून आयात होत असलेल्या शेतमालावर बंदी घालण्यात यावी, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला पूर्ण दाबाची २४ तास वीज देण्यात यावी, शेतकऱ्यांवर थकीत असलेले विद्युत देयक तसेच कर्ज पूर्णपणे माफ करण्यात यावे, वाढती बेरोजगारी लक्षात घेता ग्रामीण युवकांसाठी शेती व्यावसायातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी शेतीमध्येच भांडवलनिर्मिती होऊ शकेल असे शेती अनुकूल धोरण आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे विविध पक्षातील  राजकीय पुढारी व सत्ताधारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन सेवाग्राम आश्रमात सादर केले. सदर आदोलनाचे नेतृत्त्व शेतकरी संघटनेच्या माजी आमदार सरोज काशीकर, अनिल घनवट, जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, माजी खासदार भुपेंद्रसिंग मान, शैलजा देशपांडे, गीता खांदेभराड, सतीश दाणी यांनी केले. आंदोलनात शेकडो महिला व पुरुष शेतकऱ्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्रातील शेतकरी झाले सहभागीशेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत बापू कुटी समोर शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात सोमवारी शेतकऱ्यांचे महात्म्यांना साकडे हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सांगली, सातारा व सोलापूर हे तीन जिल्हे वगळता वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदीया यासह महाराष्ट्रातील जळगाव, परभणी आदी जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी भजन करून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला.सरकारला जागविण्यासाठी काढणार रॅलीसरकारला जागविण्यासाठी सेवाग्राम येथून आंदोलनाची सुरूवात करण्यात आली आहे. १ आणि २ रोजी राज्य कार्यकारिणीची बैठक होईल. त्यात जिल्हा पातळीवरील आंदोलनांची घोषणा होईल. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सेवाग्राम ते साबरमती रॅली काढण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी सदर आंदोलनादरम्यान लोकमतशी बोलताना सांगितले.