शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

प्रकल्पग्रस्तांना पूर्ण भरपाई

By admin | Updated: December 24, 2016 03:56 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमधील रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्यांना पूर्ण नुकसानभरपाई देऊनच रस्ता रुंदीकरणाची

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमधील रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्यांना पूर्ण नुकसानभरपाई देऊनच रस्ता रुंदीकरणाची कामे केली जातील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिली. तसेच, २७ गावांमध्ये पूर्ण दाबाने पाणी सोडण्याचे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले असून, वाढीव पाणीपुरवठ्याबाबतचा निर्णय मंगळवारी आयोजित बैठकीत होणार आहे.कल्याण-शीळ रस्त्याचा कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील टप्पा, चक्की नाका ते नेवाळी रस्ता तसेच मानपाडा रोड या तीन रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी या रस्त्यांचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. परंतु, या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या ग्रामस्थांचे काही आक्षेप होते. त्यासंदर्भात पालकमंत्री शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, आयुक्त ई रवींद्रन, २७ गावांमधील नगरसेवक, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, एमआयडीसी तसेच एमएसआरडीसीचे अधिकारी उपस्थित होते.कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे बीएसयूपीची घरे असून, त्यात रस्तेबाधितांना स्थलांतरित करण्याचा पर्याय उपलब्ध असून, त्यासाठी राज्य शासनाकडून मंजुरी मिळवून देण्याची ग्वाही शिंदे यांनी या वेळी दिली. तसेच, महापालिका हद्दीत प्रकल्पग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर ट्रान्झिट कॅम्पची उभारणी करण्याचे निर्देशही त्यांनी आयुक्तांना दिले. मानपाडा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी नव्याने सर्वेक्षण करून प्रकल्पबाधितांबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले असून, कमीतकमी बाधित होतील, अशा पद्धतीने रस्त्यांची आखणी करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. (विशेष प्रतिनिधी)