शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

राज्यातील ४६ कारखान्यांचे गाळप पूर्ण

By admin | Updated: January 11, 2017 04:33 IST

राज्यातील १४९ साखर कारखान्यांतून २७३.६३ लाख टन ऊस गाळपातून २९१.१७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आत्तापर्यंत ४६ कारखान्यांचे

पुणे : राज्यातील १४९ साखर कारखान्यांतून २७३.६३ लाख टन ऊस गाळपातून २९१.१७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आत्तापर्यंत ४६ कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले असल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली. यंदाच्या हंगामात ८७ सहकारी व ६२ कारखाने गाळप हंगामात सहभागी झाले होते. ऊसाची उपलब्धता कमी असल्याने यंदाचा हंगाम जेमतेम नव्वद ते शंभर दिवस चालेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखाने तर जेमतेम आठ ते १५ दिवस चालले. कोल्हापुरातील २८ सहकारी व ११ खासगी साखर कारखान्यांतून ९९.१० लाख टन ऊस गाळपातून ११६,४३ लाख टन साखर उत्पादित झाली असून, सरासरी साखर उतारा ११.७५ टक्के आहे. पुणे विभागातील २८ सहकारी व २४ खासगी कारखान्यांतून १०६.११ लाख टन ऊस गाळपातून १११.०३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर, १०.४६ टक्के साखर उतारा मिळाला. अहमदनगर येथील १४ सहकारी व ९ खासगी कारखान्यांतून ३४.२२ लाख टन ऊस गाळपातून ३२.५० लाख क्विंटल साखर उत्पादित झाली असून, सरासरी साखर उतारा ९.५० टक्के इतका मिळाला. औरंगाबाद येथील १७ सहकारी व खासगी कारखान्यांनी १९.३० लाख टन ऊस गाळपातून १६.७५ लाख क्विंटल उत्पादन झाले असून, ८.६८ टक्के साखर उतारा मिळाला. नांदेड येथील ११ कारखान्यांतून ९.८९ लाख टन ऊस गाळपातून ९.६५ लाख क्विंटल, अमरावतीतील ३ कारखान्यांतून २.४३ लाख टन ऊस गाळपातून २.३७ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली. नागपूर येथील ४ कारखान्यांतून २.५७ लाख टन ऊस गाळपातून २.४५ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. यंदा राज्याचा सरासरी साखर उतारा १०.६४ टक्के इतका आहे. (प्रतिनिधी) सांगली व सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखाने तर जेमतेम आठ ते १५ दिवस चालले. कोल्हापूरातील दोन, पुणे १८, अहमदनगर नऊ, औरंगाबाद व नांदेड प्रत्येकी सात, तर अमरावतीतील तीन कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत.