शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

राज्यातील ४६ कारखान्यांचे गाळप पूर्ण

By admin | Updated: January 11, 2017 04:33 IST

राज्यातील १४९ साखर कारखान्यांतून २७३.६३ लाख टन ऊस गाळपातून २९१.१७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आत्तापर्यंत ४६ कारखान्यांचे

पुणे : राज्यातील १४९ साखर कारखान्यांतून २७३.६३ लाख टन ऊस गाळपातून २९१.१७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आत्तापर्यंत ४६ कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले असल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली. यंदाच्या हंगामात ८७ सहकारी व ६२ कारखाने गाळप हंगामात सहभागी झाले होते. ऊसाची उपलब्धता कमी असल्याने यंदाचा हंगाम जेमतेम नव्वद ते शंभर दिवस चालेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखाने तर जेमतेम आठ ते १५ दिवस चालले. कोल्हापुरातील २८ सहकारी व ११ खासगी साखर कारखान्यांतून ९९.१० लाख टन ऊस गाळपातून ११६,४३ लाख टन साखर उत्पादित झाली असून, सरासरी साखर उतारा ११.७५ टक्के आहे. पुणे विभागातील २८ सहकारी व २४ खासगी कारखान्यांतून १०६.११ लाख टन ऊस गाळपातून १११.०३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर, १०.४६ टक्के साखर उतारा मिळाला. अहमदनगर येथील १४ सहकारी व ९ खासगी कारखान्यांतून ३४.२२ लाख टन ऊस गाळपातून ३२.५० लाख क्विंटल साखर उत्पादित झाली असून, सरासरी साखर उतारा ९.५० टक्के इतका मिळाला. औरंगाबाद येथील १७ सहकारी व खासगी कारखान्यांनी १९.३० लाख टन ऊस गाळपातून १६.७५ लाख क्विंटल उत्पादन झाले असून, ८.६८ टक्के साखर उतारा मिळाला. नांदेड येथील ११ कारखान्यांतून ९.८९ लाख टन ऊस गाळपातून ९.६५ लाख क्विंटल, अमरावतीतील ३ कारखान्यांतून २.४३ लाख टन ऊस गाळपातून २.३७ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली. नागपूर येथील ४ कारखान्यांतून २.५७ लाख टन ऊस गाळपातून २.४५ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. यंदा राज्याचा सरासरी साखर उतारा १०.६४ टक्के इतका आहे. (प्रतिनिधी) सांगली व सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखाने तर जेमतेम आठ ते १५ दिवस चालले. कोल्हापूरातील दोन, पुणे १८, अहमदनगर नऊ, औरंगाबाद व नांदेड प्रत्येकी सात, तर अमरावतीतील तीन कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत.