शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

राज्यात ‘आधार’ची ९४ टक्के नोंदणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 06:46 IST

पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या नोंदणीकडे अधिक लक्ष : अंगणवाडी सेविकांची प्रशासन घेणार मदत

- खलील गिरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्रातील नागरिकांची ९४ टक्के आधार नोंदणी पूर्ण झाली असून, नवजात बालक ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांच्या आधार नोंदणीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने, हे प्रमाण वाढविण्याकडे जास्त लक्ष देण्यात येत आहे. राज्य सरकारने यासाठी पुढाकार घेतला असून, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या नोंदणीसाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ९४ टक्के नागरिकांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींचे प्रमाण १०७ टक्के, ५ ते १८ वयोगटांतील व्यक्तींचे प्रमाण ८० टक्के तर शून्य ते ५ वयोगटांतील केवळ २४ टक्के जणांचीच आधार नोंदणी करण्यात आली आहे. हे प्रमाण अत्यंत कमी असल्याने या वयोगटातील आधार नोंदणी वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये एकूण लोकसंख्येच्या ९७ टक्के नागरिकांची आधार नोंदणी पूर्ण झाली आहे. पाच वर्षांपर्यंतच्या नोंदणीचे प्रमाण ३६ टक्के आहे. १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटाच्या नोंदणीचे प्रमाण १०० टक्के आहे, तर ५ ते १८ वयोगटांतील नागरिकांच्या नोंदणीचे प्रमाण ८५ टक्के आहे. गोव्यामध्ये शंभर टक्के नागरिकांची आधार नोंदणी करण्यात आली आहे. गोव्यामध्ये पाच वर्षांपर्यंतच्या नोंदणीचे प्रमाण ४८ टक्के आहे. ५ ते १८ वयोगटांतील नागरिकांच्या नोंदणीचे प्रमाण ९२ टक्के आहे. आधार हा नागरिकत्वाचा पुरावा नाही. मात्र, आधार नोंदणी अत्यावश्यक असल्याने आधार नोंदणीवर भर देण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात दररोज सुमारे ३८ हजार आधार नोंदणी केली जाते. आधार नोंदणीला मोबाइल क्रमांक जोडण्याचे प्रमाण ५५ टक्के आहे.शून्य ते ५ वयोगटातील केवळ २६ टक्के जणांचीच नोंदणी पूर्ण१३५ कोटी ३० लाख लोकसंख्येपैकी १२३ कोटी ६० लाख भारतीयांची नोंदणी करण्यात आली आहे.देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ८८.७ टक्के नागरिकांची नोंदणी पूर्ण झाली आहे.ं५ ते १८ वयोगटांतील ७५.४ टक्के नागरिकांची नोंदणी पूर्ण झाली आहे.शून्य ते ५ वयोगटांतील केवळ २६टक्के जणांचीच नोंदणी पूर्ण