शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारींमध्ये झाली घट

By admin | Updated: May 14, 2017 05:00 IST

स्वसुरक्षेसाठी महिलांनी स्वत:च स्वत:वर काही बंधने घालून घ्यावीत, रात्री-बेरात्री एकटीने बाहेर फिरू नये

ऋचिका पालोदकर। लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्वसुरक्षेसाठी महिलांनी स्वत:च स्वत:वर काही बंधने घालून घ्यावीत, रात्री-बेरात्री एकटीने बाहेर फिरू नये असे मुलींना, महिलांना कायमच सांगण्यात येते; पण ही सर्व बंधने पाळून सायंकाळी सातच्या आत घरात आलेली महिला आपल्या कुटुंबात तरी सुरक्षित आहे का? असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती अजूनही अनेक घरांमध्ये दिसून येते. महिला आपल्याच कुटुंबात कितपत सुरक्षित आहे, याबाबत जागतिक कुटुंब दिनाच्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता निदर्शनास आलेली सुखद बाब अशी की, गतवर्षीच्या तुलनेत यंदा कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये किंचित का होईना परंतु घट झालेली आहे. १५ मे हा दिवस सर्वत्र ‘कुटुंब दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांविषयी जाणून घेण्यासाठी शहरातील महिला साहाय्य कक्षाला भेट दिली असता, असे निदर्शनास आले की, कलम ४९८ अंतर्गत २०१६ या वर्षीच्या तुलनेत २०१७मध्ये नोंदविल्या गेलेल्या तक्रारींमध्ये घट झाली आहे. २०१६ या वर्षी जानेवारी ते एप्रिल या काळात कौटुंबिक हिंसाचाराच्या एकूण ४३९ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. या वर्षी एप्रिलअखेरीस ही संख्या ४१९ आहे. अर्थातच हे प्रमाण कमी असले तरी फारसे समाधानकारक निश्चितच नाही. सासू-सुनेचे वाद, नणंद- जावांकडून छळ, घरातील एखाद्या पुरुषाची वाईट नजर, नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा, कुटुंबीयांनी मर्जीविरुद्ध लग्न लावून दिल्यामुळे विवाहितेला सोसाव्या लागणाऱ्या अडचणी, वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधी वाद अशा अनेक तक्रारी घेऊन अनेक महिला या कक्षाकडे मदतीसाठी येतात. तक्रारकर्त्या महिलांमध्ये गृहिणी, कमी शिकलेल्या महिलांचे प्रमाण अधिक आहे, हेही विशेष.कुटुंबात एकमेकांना समजून घेण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे महिला साहाय्य कक्षाकडे येणाऱ्या तक्रारी वाढल्या आहेत असे वाटते. कुटुंबीयांनी येणाऱ्या सुनेला समजून घेतले आणि नव्या सुनेने जर थोडी सहनशीलता ठेवली तर अनेक प्रश्न सुटतील आणि ‘कुटुंब’व्यवस्था टिकून राहील; पण त्याचबरोबर एखाद्या महिलेवर खरोखर अत्याचार होत असेल, तर हा अन्याय सहन न क रता तिने नक्कीच कायद्यांचा आधार घेऊन स्वत:ला सुरक्षित करावे. - किरण पाटील, पोलीस निरीक्षक,महिला साहाय्य कक्ष