शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

तक्रार प्राधिकरण कागदावरच

By admin | Updated: July 20, 2015 01:42 IST

पोलिसांची एकतर्फी, बेकायदेशीर कारवाई आणि अन्यायाबाबत नागरिकांना दाद मागण्यासाठी स्थापन केलेल्या राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे अस्तित्व केवळ कागदावरच

जमीर काझी, मुंबईपोलिसांची एकतर्फी, बेकायदेशीर कारवाई आणि अन्यायाबाबत नागरिकांना दाद मागण्यासाठी स्थापन केलेल्या राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे अस्तित्व केवळ कागदावरच राहिलेले आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील बनविलेल्या प्राधिकरणाच्या कार्यालयासाठी अद्याप जागादेखील देण्यात आलेली नाही. कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक असलेल्या कर्मचारी वर्गाचीही अजून प्रतीक्षा आहे.राज्यभरातील जनतेला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या छळाबाबतची न्यायालयीन चौकशी करून निर्णय देण्याचे अधिकार प्राधिकरणाला आहेत. त्यामुळे नागरिकांवरील अन्याय दूर करण्यासाठी त्याचे कामकाज तातडीने सुरु होण्याची गरज आहे. गृह विभागाने मुलभूत बाबींची पूर्तता न केल्यामुळे प्राधिकरणाच्या काम अद्यापही सुरु होऊ शकलेले नाही. पोलीस सुधारणा अधिनियमांतर्गत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. ए. व्ही. पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांच्या समितीची स्थापना दोन महिन्यांपूर्वी करण्यात आली. त्यात राज्याचे अप्पर महासंचालक (आस्थापना) पदसिद्ध सदस्य सचिव आहेत. परंतु गृह विभागाच्या दुर्लक्षामुळे ही समिती केवळ नावापुरती उरली आहे. पोलिसांकडून निरपराध नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत नागरिकांकडून रोष व्यक्त होतो. त्यामुळे २६/११ च्या घटनेनंतर तत्कालिन सरकारने पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी महाराष्ट्र पोलीस सुधारणा अधिनियम २०१४ बनविले. त्यात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत दाद मागण्यासाठी अधिनियमाच्या २२(प)२ कलमांतर्गत महाराष्ट्र तक्रार प्राधिकरण स्थापण्याची तरतूद करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मे महिन्यात या प्रलंबित प्रस्तावाला मंजूरी दिली. त्यात न्या.पोतदार यांच्याशिवाय निवृत्त अप्पर महासंचालक पी. के. जैन व आर. आर. सोनकुसरे, निवृत्त सनदी अधिकारी रामाराव आणि पोलीस मुख्यालयातील आस्थापना विभागाचे अप्पर महासंचालक व्ही.डी.मिश्रा यांचा समावेश आहे.