शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

दोन संचालकांच्या विरोधात सभासदत्व रद्दसाठी तक्रार

By admin | Updated: August 3, 2016 00:59 IST

माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील सत्तासंघर्ष आता विकोपाला गेला आहे.

बारामती/माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील सत्तासंघर्ष आता विकोपाला गेला आहे. कारखान्याच्या एका सभासदाने दोन संचालकांना अपात्र ठरविण्यासाठी प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे यांच्याकडे तक्रार केली आहे. अनामत रकमेपोटी घेतलेली उचल ३० दिवसांच्या आत भरणे आवश्यक असताना त्याची पूर्तता केली नाही; त्यामुळे सहकारी संस्था कायद्यानुसार उज्ज्वला हर्षल कोकरे, दत्तात्रय गणपत गवारे यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. यावर १० आॅगस्ट रोजी सुनावणी होईल. याबाबतचे पत्र संबंधित संचालक, माळेगाव कारखाना तसेच तक्रारदार यांना प्रादेशिक सहसंचालकांनी पाठविले आहे. संचालक अपात्र ठरल्यास कारखान्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष काही प्रमाणात कमी होईल. मात्र, कुरघोडीच्या राजकारणात कारखान्याचे सभासद रामचंद्र विठ्ठल टेकवडे (रा. माळेगाव, ता. बारामती) यांनी तक्रार अर्ज दाखल केला. या तक्रार अर्जात संचालिका उज्ज्वला हर्षल कोकरे २ लाख आणि दत्तात्रय गणपत गवारे यांनी १ लाख रुपये एप्रिल २०१६मध्ये अनामत रकमेपोटी उचल घेतली होती. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०च्या कलम ७३ क, अ व नियम ५८ नुसार ही रक्कम ३० दिवसांच्या आत भरणे आवश्यक आहे. मात्र, या संचालकांनी त्याची पूर्तता न केल्याने त्यांचे सभासदत्व रद्द करावे, अशी तक्रार केली आहे.यापूर्वी ८ संचालकांनी बंडखोरी केली होती; मात्र मध्यंतरीच्या तडजोडीनंतर ५ जणांचे बंड कायम राहिले. इतरांनी सत्ताधारी गटाशी जुळवून घेतले. या ५ बंडखोर संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली तेव्हापासून राजकारण फिरले. राष्ट्रवादीचे ६ आणि बंडखोरी केलेले ५ संचालक म्हणून ११ जणांनी कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांच्या सह्यांचे अधिकार काढून घेण्याबाबत बैठक बोलवावी, अशी मागणी प्रादेशिक सहसंचालकांकडे केली होती. मात्र, प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०, सहकारी संस्था १९६१ तसेच कारखान्याच्या नोंदणीकृत उपविधीच्या अनुषंगाने तसे निर्देश देता येत नाहीत, असे स्पष्ट केले. त्यानंतर कोकरे आणि गवारे या दोन संचालकांच्या उचलीसंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावर म्हणणे मांडण्यासाठी १० आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी उपस्थित राहावे, असे आदेश प्रादेशिक सहसंचालकांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)>माळेगाव सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात एफआरपीपेक्षा अधिक २,८०० रुपये दर दिला आहे. तो राज्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. पुढील हंगामाची तयारीदेखील सध्या सुरू असताना सत्तासंघर्ष विकोपाला गेला आहे. त्यातच संचालकांच्या उचलीसंदर्भात तक्रार दाखल झाल्याने आता पुढे काय होणार, याची उत्सुकता सभासदांना लागली आहे. कारखान्यात यापूर्वीदेखील १९९७मध्ये सत्तांतर झाले होते. त्यानंतर पुन्हा चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी एकत्र येऊन दीड वर्षापूर्वी अजित पवार यांच्या पॅनलचा पराभव करून सत्ता मिळविली.