शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवडीसोबत संगोपनावर भर

By admin | Updated: July 2, 2016 03:42 IST

ठाणे जिल्ह्यात शासकीय यंत्रणांसह सामाजिक संस्थांनी या वनोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यात ठिकठिकाणी १३ लाख वृक्षलागवड केली.

ठाणे : दोन कोटी वृक्षलागवडीच्या उपक्रमास अनुसरून ठाणे जिल्ह्यात शासकीय यंत्रणांसह सामाजिक संस्थांनी या वनोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यात ठिकठिकाणी १३ लाख वृक्षलागवड केली. या उपक्रमाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम माजिवडा येथील स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानात पार पडला. याप्रसंगी डॉ. महेंद्र कल्याणकर म्हणाले की, हे केवळ वृक्षारोपणच नव्हे तर या झाडांचे संगोपन करून ती कशी टिकतील, याकडे लक्ष देणार असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली. सुमारे १३ लाख झाडे म्हणजेच दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ३ लाख झाडे जास्त लावण्यासाठी संपूर्ण जिल्हा सज्ज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी साकेत येथील कार्यक्रमप्रसंगी सांगितले. या वेळी हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे... या विश्वप्रार्थनेनंतर उपस्थित मान्यवरांसह सर्वांनी आकाशात हिरवे, पांढरे फुगे सोडण्याचा आनंद घेतला. जैवविविधता उद्यानात विविध प्रकारचे वृक्ष व फुलांचे रोपटे या वेळी लावले. या वेळी महापौर संजय मोरे, आमदार संजय केळकर, अतिरिक्त मुख्य सचिव तथा पालक सचिव के.पी. बक्षी, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, हिंदी चित्रपट अभिनेत्री तनिशा मुखर्जी, मराठी चित्रपट अभिनेता उदय सबनीस, संपदा कुलकर्णी आदींनी या वनोत्सव कार्यक्रमात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांसमवेत जल्लोष केला.याप्रसंगी सरस्वती विद्यालय, महाराष्ट्र विद्यालय या शाळांच्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली. ठाणा कॉलेज, एनकेटी, ज्ञानसाधना या महाविद्यालयांचे एनसीसीचे विद्यार्थी यात सहभागी झाले. पोलीस पथकाचा वाद्यवृंद आणि देशप्रेम वाढवणाऱ्या गाण्याच्या सुरात साकेत येथे हा वनोत्सव साजरा झाला. >कौसाच्या ३५० हेक्टर डोंगरावर ७२ हजार वृक्षलागवडठाणे : पावसाची संततधार, हजारोंच्या संख्येने जमलेले विद्यार्थी, नागरिक, विविध संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची गर्दी पाहायला मिळाली, ती कौसाच्या, देवरीपाड्याच्या ३५० हेक्टर डोंगरावर. निमित्त होते, ते ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित वृक्षलागवड कार्यक्रमाचे. उपस्थितांनी आपापले गट करून डोंगरमाथ्यावर जाऊन रोपे लावली. यात तरुणांबरोबरच ज्येष्ठांचा सहभागही वाखाणण्यासारखाच होता. दरम्यान, महापालिकेच्या वतीने दोन वर्षांत ५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठेवले आहे. या वेळी जिल्ह्याचे पालक सचिव के.पी. बक्षी, महापौर संजय मोरे, खा.डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक उपस्थित होते. >वनोत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धाठाणे : कल्याणच्या बेतूरकरपाडा येथील कै. बापुराव आघारकर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या रांगोळी, चित्रकला आणि घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या. याशिवाय, वृक्षदिंडी काढून वनोत्सवाची जनजागृती केली. एकतरी झाड लावण्याचे उद्दिष्ट सफल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी उंबर्डे गावाजवळील भूखंडावर वृक्षारोपण केले. केवळ झाडच न लावता वृक्षसंवर्धनही करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. शाळेच्या मुख्याध्यापिका कमलिनी जीवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वृक्षलागवड केली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष दीपक ब्रीद, आत्माराम जोशी, खोपकर, आदींनी यात सहभाग घेतला.