शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
3
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
4
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
5
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
6
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
7
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
8
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
9
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
10
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
11
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
12
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
13
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
14
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
15
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

शेतकऱ्यांना ८९३ कोटींची नुकसान भरपाई

By admin | Updated: March 2, 2017 05:32 IST

राज्यातील २६ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ८३ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली

मुंबई : रब्बी हंगाम २०१५-१६ मधील आठ अधिसूचित पिकांकरिता राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत, राज्यातील २६ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ८३ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. लातूर विभागात सर्वाधिक सुमारे १३ लाख शेतकऱ्यांना ४०२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप करण्यात येणार आहे.रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी (बागायत व जिरायत), करडई, सूर्यफूल, गहू (बागायत व जिरायत), कांदा, उन्हाळी भुईमूग व उन्हाळी भात ही आठ पिके अधिसूचित करण्यात आली होती. राज्यातील ३४.२६ लाख शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला होता. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी ५६ कोटी ९१ लाख विमा हप्ता भरून २४.६० लाख हेक्टर क्षेत्राकरिता २८६५.४० कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले होते.योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत शेतकरी विमा हप्ता वजा जाता, केंद्र शासनाचा हिस्सा ४०८.९२ कोटी रुपये व राज्य शासनाचा तेवढाचा हिस्सा अशी एकूण ८१७.८४ कोटी रुपये रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)>रब्बी हंगाम २०१५-१६ मधील भरपाईची रक्कमनाशिक विभाग - ३२ लाख २२ हजार ९२३पुणे विभाग - १०७ कोटी ३६ लाख ३२ हजार ९१८कोल्हापूर विभाग - १० कोटी २८ लाख ५३ हजार ५४२औरंगाबाद विभाग - ३४० कोटी ५७ लाख ५ हजार ४८०लातूर विभाग - ४०२ कोटी ८४ लाख ८७ हजार १५३अमरावती विभाग - ३१ कोटी ७६ लाख ८४ हजार ५३७नागपूर विभाग - ६६ लाख ७६ हजार ६२७रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी (बागायत व जिरायत), करडई, सूर्यफूल, गहू (बागायत व जिरायत), कांदा, उन्हाळी भुईमूग व उन्हाळी भात ही आठ पिके अधिसूचित करण्यात आली होती.