शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
2
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
3
धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला
4
तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप
5
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
6
ओला, चेतक, TVS, एथर आणि व्हिडापैकी कोण आहे सरस? पाहा किंमत, रेंज आणि टॉप स्पीड
7
सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?
8
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
9
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
10
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
11
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
12
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
13
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
14
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
15
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
16
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
17
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
18
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
19
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
20
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर

रेशीम उद्योगातील शेतकर्‍यांना मिळणार नुकसान भरपाई

By admin | Updated: June 16, 2014 22:12 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या रेशीम उद्योगातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्‍वासन मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात दिले.

अकोला : यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या रेशीम उद्योगातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्‍वासन मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात दिले. विधान परिषदेचे आ. डॉ. रणजित पाटील यांनी याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. यंदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेली गारपीट आणि हवामानातील बदलामुळे पिकांचे आतोनात नुकसान झाले होते. याचा फटका वाडेगाव परिसरासह बाळापूर आणि पातूर तालुक्यातील रेशीम प्रकल्पांनाही बसला होता. ५0 टक्क्यांपेक्षा जास्त प्रकल्पांचे नुकसान झाले होते. जिल्ह्यात एकूण ७६ एकरावर तुती लागवड आहे; मात्र गारपिटीमुळे रेशीम प्रकल्पांचे नुकसान झाले असून, यामध्ये बीजकोश, अळ्यांसह पायाभूत सुविधांचाही समावेश आहे. रेशमी उद्योगातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आ. डॉ. रणजित पाटील यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात तारांकित प्रश्नाद्वारे केली होती. यावर मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी विधान परिषदेमध्ये ओलितापेक्षा दीडपट जास्त आर्थिक मदत देण्याचे आश्‍वासन दिले. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी सात दिवसांच्या आत संपर्क साधण्याचे आवाहन आ. डॉ. रणजित पाटील यांनी केले आहे.