शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या

By admin | Updated: August 4, 2016 02:38 IST

अतिवृष्टिमुळे बाधित झालेल्या भातशेती, फळबाग व फुलबागाच्या सुमारे ४०० हेक्टर शेतीचेच तातडीने पंचनामे करुन बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी

वसई : तालुक्यात गेल्या ८ दिवसात झालेल्या अतिवृष्टिमुळे बाधित झालेल्या भातशेती, फळबाग व फुलबागाच्या सुमारे ४०० हेक्टर शेतीचेच तातडीने पंचनामे करुन बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज वसईच्या तहसीलदारांकडे केली आहे.वसई विरार जिल्हा काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष डॉमनिक डिमेलो यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाने वसईचे तहसीलदार गजेंद्र पाटोळे यांची भेट घेऊन वसई तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आग्रही मागणी शासनाकडे करणारे एक निवेदन दिले.यावेळी प्रदेश कॉँग्रेसचे सचिव विजय पाटील,वसई तालुका अध्यक्ष राम पाटील,सचिव किरण शिंदे, राजू गव्हाणकर,गीता र्वेर्णेकर, सीलु परेरा, निलेश पेंढारी,गणेश पाटील,नंदकुमार महाजन, रोहिणी कोचरेकर,लक्ष्मी मुदभटकल, श्रुती हटकर, प्रवीणा चौधरी, आसिफ शेख, दिलीप केवट,आशीष सुळे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम विभागातील सुमारे ४०० हेक्टर शेती आठवडाभर पाण्याखाली राहिल्याने वाया गेली असून पिके उध्वस्त होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे डॉमिनिक डिमेलो यांनी तहसीलदाराच्या निदर्शनास आणून दिले.यावर तहसीलदार पाटोळे यांनी नुकसानीचे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मार्फ़त तातडीने पंचनामे करण्यात येतील व कृषी विभागाला सुद्धा याबाबत आदेश देऊ असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी) >यंदाही भातशेती खड्ड्यांत जाणारविक्रमगड : यंदा शेतकऱ्यांनी विविध जातीचे बियाणे लावली आहेत. त्यातच उशिरा पाऊस सुरु झाल्यानंतर गेले काही दिवस पावसाची संततधार सुरु असल्याने व आता तर मुसळणार अतिवृष्टीने ठिकठिकाणची रोपे कुजण्याचे प्रकार सुरु झाल्याने यंदाही भात उत्पादनात घट होणार आहे़. त्यामुळे तालुक्यातील विविध भागामध्ये कृषी अधिकाऱ्यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भातलागवडीची प्रत्यक्ष पाहणी व पंचनामे करावे व त्यांना पीक विमा योजनेचा लाभ द्यावा अशी मागणीही केली आहे़>वाड्यात भातशेती पाण्याखालीवाडा : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेली भाताची लागवड पाण्याखाली बुडाली असल्याने भातलागवड कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी शेते पाण्याने भरलेली असल्याने येथे भाताची लागवड करणे शेतकऱ्यांना शक्य झालेले नाही.या ठिकाणी उशिरा लागवड झाल्यामुळे हे भातपीक रोगालाही बळी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील तानसा, वैतरणा, पिंजाळ, गारगाई, आखाडी, या नद्या दुथडी भरून वाहत असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.तानसा व वैतरणा धरणेही भरून वाहण्याच्या स्थितीत असल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास दोन्ही नदीकाठच्या गावांतही पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाने तालुक्यातील रस्तेही खराब झाले असून कोंढले, डोंगस्ते, देवघर मलवाडा, येथील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील डकिवली-केलठण रस्ता अतिवृष्टीने ठिकठिकाणी खचला आहे व खड्डे पडून या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली असून येथील ग्रामस्थांना वजे्रश्वरीहून १० किलो मीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.