शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
3
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
4
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
5
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
6
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
7
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
8
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
9
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
10
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
11
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
12
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
13
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
14
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
15
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
16
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
17
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
18
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
19
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
20
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?

काश्मीर-बलुचिस्तानची तुलना चुकीची- अशोक श्रीवास्तव

By admin | Updated: September 8, 2016 06:14 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये बलुचिस्तानचा उल्लेख केल्यापासून, काश्मीर आणि बलुचिस्तान यांची तुलना केली जात आहे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये बलुचिस्तानचा उल्लेख केल्यापासून, काश्मीर आणि बलुचिस्तान यांची तुलना केली जात आहे, ती अकारण आहे असे मत ज्येष्ठ पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनी केले. मुंबई प्रेस क्लबद्वारे आयोजित केलेल्या बलुचिस्तानवरील चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. मात्र इतर वक्त्यांच्या भाषणांमध्ये भारत पाकिस्तानच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा संदेश जगभरात गेल्याचा सूर व्यक्त झाला.या वेळेस श्रीवास्तव म्हणाले, ‘काश्मीर किंवा जगातील कोणत्याही संघर्ष चालू असलेल्या प्रदेशात, मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांचा उल्लेख किंवा तशा घटनांच्या नोंदी अटळ आहेत. मात्र, म्हणून बलुचिस्तान आणि काश्मीर यांची तुलना करणे अयोग्य वाटते. दोन्ही प्रदेशांचा, त्यांच्या प्रश्नांचा इतिहास आणि वर्तमान वेगवेगळा आहे. त्यांच्या प्रश्नांची पार्श्वभूमीही वेगळी आहे. त्यामुळे त्या दोन प्रश्नांना जोडू नये. बलुचिस्तानचा मुद्दा भारताने उचलल्यावर, पाकिस्तानात भारताविरोधी मत एकत्र होईल, असे मुळीच वाटत नाही. त्याचप्रमाणे, बलुचिस्तानात निवडून आलेले सरकार अस्थिर होईल, असे म्हणणे हास्यास्पद आहे. कारण तेथे निवडणुका मुळीच निष्पक्ष पद्धतीने होत नाहीत. याउलट काश्मीर खोऱ्यामध्ये निवडणुका फारच चांगल्या पद्धतीने राबविल्या गेल्या आहेत. भारताने बलुचिस्तानातील मानवाधिकाराचा मुद्द्यावर मत व्यक्त करणे काहीच गैर नाही. श्रीवास्तव यांच्या या मताच्या अगदी विरोधी मत ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी व्यक्त केले. बलुचिस्तान हा इराण आणि अफगाणिस्तानातही पसरला आहे. भारताने इराणमधील चाबहर बंदर विकसित करण्यास घेतले आहे, ते पाकिस्तानच्या ग्वादर बंदरापासून केवळ ७० किमी दूर आहे. त्यामुळे इराण आणि भारताच्या संबंधांवरही याचा परिणाम होऊ शकतो. जतीन देसाई यांनी बलुचिस्तानच्या इतिहासाचा आणि राजकीय घडामोडींचा धावता आढावा घेताना, बलुचस्तिान हा संपन्न प्रदेश आहे, पण बलुच लोक गरीब आहेत, असे बलुचिस्तानचे थोडक्यात वर्णन केले. (प्रतिनिधी)