शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

एमआयडीसींमधील ठेक्यांच्या ‘दादा’गिरीवर समितीचा उतारा

By admin | Updated: July 5, 2015 01:41 IST

राज्यात उद्योगांना पोषक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उद्योगांसाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या ७६ वरून ३७ वर आणली असून,

नारायण जाधव, ठाणेराज्यात उद्योगांना पोषक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उद्योगांसाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या ७६ वरून ३७ वर आणली असून, १३ कामगार कायद्यांत बदल करण्याच्या हालचाली तीव्र केल्या आहेत. राज्यस्तरावरील या निर्णयानंतर उद्योजकांना स्थानिक स्तरावर त्या-त्या ठिकाणचे राजकीय नेते, कामगार पुढाऱ्यांसह गावगुंड आणि कंत्राटदारांकडून अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या राजकीय ‘दादा’गिरीवर उपाय शोधण्यासाठी उद्योग खात्याने पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखालील समितीचा उतारा शोधला आहे.अलीकडे राज्यातील विविध एमआयडीसींमध्ये एखादा उद्योग उभारताना उद्योजकांना स्थानिक पातळीवर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यात कुणी जमीन संपादनास विरोध करतो, तर कुणी एमआयडीसीने दिलेल्या जमिनीवर उद्योग उभारण्यास अडचणी निर्माण करतो. काही कथित नेते अमक्यालाच ठेका मिळाला पाहिजे म्हणून किंवा आमचीच माणसे कामाला ठेवावीत, यासाठी राजकीय दबाव आणतो. कुणी कारखान्यासाठी लागणारी सामग्री आणण्यासाठी किंवा तिच्या चढउतारासाठी माथाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अडथळा आणतो. काही ठिकाणी स्थानिक गावगुंड खंडणीची मागणी करतात, अशा अनेक तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. या सर्वांवर सामोपचाराने तोडगा निघावा म्हणून या समितीची स्थापना केली आहे. या समितीत औद्योगिक क्षेत्राशी संबंधित महसूल विभागाचा उपविभागीय अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, जिल्हा कामगार अधिकारी आणि एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीने आवश्यकतेनुसार दर सहा महिन्यांतून किमान एकदा बैठक घेऊन या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, असे सांगण्यात आले आहे. यासाठी उद्योग विभागाने ‘एकात्मिक सुलभता कक्षा’ची निर्मिती केली असून, त्यात उद्योगांशी संबंधित प्रतिनिधींचा समावेश आहे. तसेच आता त्या ठिकाणी नोडल आॅफिसर म्हणून पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.२७ एमआयडीसींना फायदा : राज्यातही केंद्र सरकारच्या भूसंपादन कायद्याला विरोध होत आहे. तसेच मुंबई-दिल्ली कॉरिडोअरसह औरंगाबाद, नागपूर, पुणे, चाकण, नवी मुंबई, रायगड, कोकणात अनेक येऊ घातलेल्या उद्योग व उद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, उद्योग उभारण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ही समिती स्थापन केली आहे. तिचा फायदा राज्यातील सुमारे १ लाख ३० हजार एकरांवर वसलेल्या २२७ एमआयडीसींतील हजारो उद्योगांना होणार आहे.