शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

कम्युनिस्टांचे सरकार म्हणजे राजकीय हत्याकांड

By admin | Updated: June 22, 2017 05:44 IST

कम्युनिस्ट विचारधारा असणाऱ्या पक्षांचे सरकार जिथे आहे, तिथे मोठ्या प्रमाणावर राजकीय हत्याकांड घडतात.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कम्युनिस्ट विचारधारा असणाऱ्या पक्षांचे सरकार जिथे आहे, तिथे मोठ्या प्रमाणावर राजकीय हत्याकांड घडतात. विशेष म्हणजे या राजकीय हत्याकांडाचा कधी तपास होत नाही किंवा खुनीही सापडत नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कम्युनिस्टांवर टीका केली. ‘त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा - माणिक सरकार’ या पुस्तक प्रकाशनानंतर मुख्यमंत्री बोलत होते. पूर्वोत्तर राज्यातील त्रिपुरा या राज्यात चार दशकांपासून कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्सवादी)ची सत्ता आहे. तर, १९९८पासून माणिक सरकार या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या राजवटीवर पत्रकार दिनेश कानजी यांनी लिहिलेल्या ‘त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा - माणिक सरकार’ या पुस्तकाचे स्वातंत्र्यवीर स्मारकात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, अतुल भातखळकर, माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर आदी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांचा खरा चेहरा आणि दाखवायचा चेहरा भिन्न आहे. देशविघातक शक्तींना प्रोत्साहन देणारे हे सरकार आहे. राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करून देशाच्या सुरक्षेशी खेळणारे आणि केंद्रातून येणारा निधी लुटणारे सरकार आहे. कम्युनिस्टांनी त्रिपुरातही राजकीय हत्याकांडे घडवली. दुर्गम प्रदेश असल्याने संपर्काच्या साधनांचा अभाव आणि मागासलेपणामुळे येथील भीषण वास्तव बाहेरच्या लोकांपर्यंत पोहचत नाही. त्रिपुरातील या अराजकतेचा या पुस्तकातून पर्दाफाश झाला आहे.माणिक सरकार म्हणजे ‘तो मी नव्हेच’ या नाटकातील लखोबा लोखंडे आहे. या माणसांना मी एकेकाळी देवदूत समजत होतो. हे पुस्तक वाचल्यानंतर प्रतिमाभंजन होऊन माणिक सरकार यांचे खरे रूप समोर येते, असे भारतकुमार राऊत म्हणाले.