शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कम्युनिस्टांचे सरकार म्हणजे राजकीय हत्याकांड

By admin | Updated: June 22, 2017 05:44 IST

कम्युनिस्ट विचारधारा असणाऱ्या पक्षांचे सरकार जिथे आहे, तिथे मोठ्या प्रमाणावर राजकीय हत्याकांड घडतात.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कम्युनिस्ट विचारधारा असणाऱ्या पक्षांचे सरकार जिथे आहे, तिथे मोठ्या प्रमाणावर राजकीय हत्याकांड घडतात. विशेष म्हणजे या राजकीय हत्याकांडाचा कधी तपास होत नाही किंवा खुनीही सापडत नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कम्युनिस्टांवर टीका केली. ‘त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा - माणिक सरकार’ या पुस्तक प्रकाशनानंतर मुख्यमंत्री बोलत होते. पूर्वोत्तर राज्यातील त्रिपुरा या राज्यात चार दशकांपासून कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्सवादी)ची सत्ता आहे. तर, १९९८पासून माणिक सरकार या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या राजवटीवर पत्रकार दिनेश कानजी यांनी लिहिलेल्या ‘त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा - माणिक सरकार’ या पुस्तकाचे स्वातंत्र्यवीर स्मारकात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, अतुल भातखळकर, माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर आदी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांचा खरा चेहरा आणि दाखवायचा चेहरा भिन्न आहे. देशविघातक शक्तींना प्रोत्साहन देणारे हे सरकार आहे. राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करून देशाच्या सुरक्षेशी खेळणारे आणि केंद्रातून येणारा निधी लुटणारे सरकार आहे. कम्युनिस्टांनी त्रिपुरातही राजकीय हत्याकांडे घडवली. दुर्गम प्रदेश असल्याने संपर्काच्या साधनांचा अभाव आणि मागासलेपणामुळे येथील भीषण वास्तव बाहेरच्या लोकांपर्यंत पोहचत नाही. त्रिपुरातील या अराजकतेचा या पुस्तकातून पर्दाफाश झाला आहे.माणिक सरकार म्हणजे ‘तो मी नव्हेच’ या नाटकातील लखोबा लोखंडे आहे. या माणसांना मी एकेकाळी देवदूत समजत होतो. हे पुस्तक वाचल्यानंतर प्रतिमाभंजन होऊन माणिक सरकार यांचे खरे रूप समोर येते, असे भारतकुमार राऊत म्हणाले.