शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

संघर्ष यात्रेला संवाद यात्रेने उत्तर देऊ - मुख्यमंत्री

By admin | Updated: April 28, 2017 03:06 IST

शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला जे जबाबदार आहेत, तेच संघर्ष यात्रा काढत आहेत. केवळ संघर्ष नाव दिल्याने संघर्ष होत नाही.

पिंपरी-चिंचवड : शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला जे जबाबदार आहेत, तेच संघर्ष यात्रा काढत आहेत. केवळ संघर्ष नाव दिल्याने संघर्ष होत नाही. तुमच्या संघर्ष यात्रेला आम्ही संवाद यात्रेतून उत्तर देऊ, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप गुरुवारी झाला. या वेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या विविध योजनांचा पाढा वाचत विरोधकांना टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, ज्यांनी पंतप्रधानांच्या पॅकेजचे पैसे खाल्ले, तेच आज संघर्ष यात्रा काढत आहेत. ज्या संघर्ष यात्रेने राज्यात सत्तापरिवर्तन घडविले ती गोपीनाथ मुंडेंनी काढलेली संघर्ष यात्रा खरी होती. विरोधकांच्या संघर्ष यात्रेला आम्ही संवाद यात्रेतून उत्तर देऊ. खासदार, आमदार आणि पदाधिकारी २५ लाख शेतकऱ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधतील. शिवाय, ही संवाद यात्रा वातानुकुलीत बसने असणार नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू आदी नेते व पदाधिकारी उपस्थित होते. ...तर व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हाकेंद्र सरकारने ११ लाख टन तूर खरेदी केली. तर राज्य सरकारने ४ लाख टन तुरीची खरेदी केली आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांनी सत्तेत असताना १३ लाख टन तुरीचे उत्पादन असताना केवळ २० हजार टन तूर खरेदी केली होती. २२ एप्रिलपर्यंत टोकन मिळालेल्या शेतकऱ्यांची सगळी तूर खरेदी केली जाईल. मात्र, व्यापाऱ्यांच्या तुरीचा दाणाही खरेदी केला जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

म्हणून बुरूज ढासळले!सत्तेत असताना ते मालक असल्याच्या तोऱ्यात वावरले म्हणून त्यांचे बुरूज ढासळले. पिंपरी-चिंचवडमध्ये पवार, कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण, सोलापुरात मोहिते-पाटील, इस्लामपूरला जयंत पाटील आणि सांगलीत पतंगराव कदम यांचे बुरूज ढासळले, असे मुख्यमंत्री म्हणाले.