शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

संघर्ष यात्रेला संवाद यात्रेने उत्तर देऊ - मुख्यमंत्री

By admin | Updated: April 28, 2017 03:06 IST

शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला जे जबाबदार आहेत, तेच संघर्ष यात्रा काढत आहेत. केवळ संघर्ष नाव दिल्याने संघर्ष होत नाही.

पिंपरी-चिंचवड : शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला जे जबाबदार आहेत, तेच संघर्ष यात्रा काढत आहेत. केवळ संघर्ष नाव दिल्याने संघर्ष होत नाही. तुमच्या संघर्ष यात्रेला आम्ही संवाद यात्रेतून उत्तर देऊ, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप गुरुवारी झाला. या वेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या विविध योजनांचा पाढा वाचत विरोधकांना टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, ज्यांनी पंतप्रधानांच्या पॅकेजचे पैसे खाल्ले, तेच आज संघर्ष यात्रा काढत आहेत. ज्या संघर्ष यात्रेने राज्यात सत्तापरिवर्तन घडविले ती गोपीनाथ मुंडेंनी काढलेली संघर्ष यात्रा खरी होती. विरोधकांच्या संघर्ष यात्रेला आम्ही संवाद यात्रेतून उत्तर देऊ. खासदार, आमदार आणि पदाधिकारी २५ लाख शेतकऱ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधतील. शिवाय, ही संवाद यात्रा वातानुकुलीत बसने असणार नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू आदी नेते व पदाधिकारी उपस्थित होते. ...तर व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हाकेंद्र सरकारने ११ लाख टन तूर खरेदी केली. तर राज्य सरकारने ४ लाख टन तुरीची खरेदी केली आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांनी सत्तेत असताना १३ लाख टन तुरीचे उत्पादन असताना केवळ २० हजार टन तूर खरेदी केली होती. २२ एप्रिलपर्यंत टोकन मिळालेल्या शेतकऱ्यांची सगळी तूर खरेदी केली जाईल. मात्र, व्यापाऱ्यांच्या तुरीचा दाणाही खरेदी केला जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

म्हणून बुरूज ढासळले!सत्तेत असताना ते मालक असल्याच्या तोऱ्यात वावरले म्हणून त्यांचे बुरूज ढासळले. पिंपरी-चिंचवडमध्ये पवार, कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण, सोलापुरात मोहिते-पाटील, इस्लामपूरला जयंत पाटील आणि सांगलीत पतंगराव कदम यांचे बुरूज ढासळले, असे मुख्यमंत्री म्हणाले.