शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रिक्षाचालक-मालकांच्या कल्याणकारी मंडळासाठी आठवडाभरात समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 06:17 IST

मुख्यमंत्र्यांचे संघटनांना आश्वासन; इतर मागण्यांबाबत लवकरच घेणार निर्णय

मुंबई : रिक्षाचालक-मालकांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यांचे कल्याणकारी मंडळ लवकरच स्थापन केले जाईल. यासाठी शासन आणि संघटनांच्या प्रतिनिधींची एक संयुक्त समिती येत्या सात दिवसांत गठित करून त्यामार्फत कल्याणकारी मंडळाचे कामकाज तसेच रिक्षाचालक-मालकांसाठी राबवायच्या विविध योजनांची आखणी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे रिक्षाचालक-मालकांच्या विविध संघटनांसोबत झालेल्या बैठकीत जाहीर केले.

रिक्षाचालक-मालक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी मंत्रालयात संयुक्त बैठक झाली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महाराष्ट्र रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांच्यासह राज्यातील विविध रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी रिक्षा संघटनांनी मंगळवारी संप पुकारला होता. परंतु याबाबत मंगळवारी संयुक्त बैठक घेऊन मागण्यांवर तोडगा काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आॅटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष शशांक राव यांना दिले होते. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा हा संप मागे घेण्यात आला. रिक्षा संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संघटनांना बैठकीसाठी निमंत्रित केले होते.

या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, रिक्षाचालक-मालकांच्या कल्याणकारी मंडळासाठी भरीव निधी देण्याची तरतूद केली जाईल. मंडळामार्फत रिक्षाचालक-मालक यांच्यासाठी विविध योजना राबविल्या जातील. या योजना कोणत्या असाव्यात तसेच कल्याणकारी मंडळाचे स्वरूप काय असावे हे ठरविण्यासाठी येत्या सात दिवसांत शासनाचे काही प्रतिनिधी आणि संघटनांचे प्रतिनिधी यांची समिती गठित केली जाईल. समितीच्या शिफारशीनंतर लगेचच कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्यामार्फत रिक्षाचालक-मालकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतील. सोबतच रिक्षाचालक-मालकांच्या इतर विविध मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असून त्याबाबतही लवकरच निर्णय घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.इतर मागण्यांसंदर्भात ठोस आश्वासन नाहीरिक्षाचालक-मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, याच मागणीवर निर्णय झाला आहे. ग्राहक निर्देशांकातील वाढीनुसार रिक्षाभाडे ठरवावे, अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथक नेमावे, राज्यातील रिक्षांचे मुक्त परवाने बंद करावेत, ओला, उबेर आणि इतर बेकायदेशीर टॅक्सी कंपन्यांची सेवा बंद करावी आदी मागण्यांवर कोणताही निर्णय झाला नाही. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तत्काळ संप मागे घेण्यात आला, पण केवळ एकच मागणी मान्य केली आहे, इतर मागण्यांवर कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही.- के. एल. तिवारी, मुंबई अध्यक्ष, स्वाभिमान रिक्षा संघटना

सकारात्मक चर्चामुख्यमंत्र्यांसोबत कृती समितीची बैठक झाली. यात सकारात्मक चर्चा झाली. कल्याणकारी महामंडळचे गठन व्हावे, या माध्यमातून इतर योजना राबवता याव्यात यासाठी सात दिवसांत समितीचे गठन करू, असे आश्वासन दिले. याची अंमलबजावणी कशी केली जाईल याबाबत एक समिती स्थापन केली जाईल. ती तीन महिन्यांत निर्णय देईल. अवैध प्रवासी वाहतुकीबाबत एक कायमस्वरूपी भरारी पथक असावे, मुक्त रिक्षा परवाने बंद झाले पाहिजेत, कारण रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर लवकरात लवकर निर्णय घेऊ, भाडेवाढीसंदर्भात - हकीम कमिटीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत लक्ष घालू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.- शशांक राव, अध्यक्ष, आॅटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती