शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
5
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
6
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
7
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
8
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
9
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
10
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
11
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
12
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
13
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
14
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
15
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
16
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
17
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
18
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
19
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
20
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!

फरार कैद्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी समिती

By admin | Updated: September 18, 2016 03:01 IST

कारागृहात शिक्षा भोगणारे कैदी अनेकदा संचित (फर्लो) आणि अभिवचन (पॅरोल) रजेवरून फरार होतात.

मुंबई : कारागृहात शिक्षा भोगणारे कैदी अनेकदा संचित (फर्लो) आणि अभिवचन (पॅरोल) रजेवरून फरार होतात. त्यास पायबंद घालण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना सुचिवण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.कैद्यांना कारागृहाबाहेर आल्यानंतर चांगले जीवन जगता येण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबरोबरच त्यांना शिस्त आणि कायद्याची जरब बसवण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात येत आहेत. त्यासाठी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव (अपील व सुरक्षा) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), अपर पोलीस महासंचालक (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग), पुणे येथील अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह), सायबर सेलचे महानिरीक्षकांचा समावेश आहे. गृह विभागाचे उपसचिव (तुरुंग) हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)तसेच विधि व न्याय विभागाचे प्रधान सचिव आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव यांचाही या समितीत समावेश असेल. >कारागृहात दाखल होणाऱ्या कैद्यांचा वैयक्तिक तपशील इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संकलित करण्यासाठी त्यांच्या हातांच्या अंगठ्यांचे ठसे बायोमेट्रिक फिंगर प्रिंट रिडरच्या सहाय्याने घेण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी राज्यातील सर्व कारागृहांमध्ये आवश्यक उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे कैद्यांच्या डोळ्यांचे स्कॅन करणे, त्यांचे आधारकार्ड काढणे आणि रजेवर जाणाऱ्या कैद्यांवर ईलेक्ट्रॉनिक चिपच्या साह्याने नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक पद्धती अवलंबण्याचे नियोजन करण्यात येत आहे.