शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

पोलीस कुटुंबीयांच्या समस्यांसाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2017 03:56 IST

पोलीस अंमलदार व त्यांच्या कुटुंबियांच्या विविध समस्याच्या निराकरणासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरु

मुंबई : पोलीस अंमलदार व त्यांच्या कुटुंबियांच्या विविध समस्याच्या निराकरणासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने आता दखल घेतली आहे. समस्याबाबतचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. अतिवरिष्ठ पोलीस अधिकारी, दोन्ही गृहराज्यमंत्री, आमदारांसह २१ जणांचा जम्बो समितीमध्ये पोलीस संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्याबाबतचा आदेश गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे.पोलिसांची अवेळची ड्यूटी, कामाचा वाढत्या ताणामुळे त्यांचे मानसिक, कौटुंबिक समस्या, अपुरी निवासस्थाने, पाल्यांच्या शिक्षण, आरोग्याच्या प्रश्नाबाबत शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने गेल्या आठ महिन्यांपासून पोलीस पत्नी व पोलीस बाईज संघटनांतर्फे एकत्रित व स्वतंत्रपणे आंदोलन करण्यात येत होते. मात्र शासनाकडून आश्वासनाव्यतिरिक्त काहीच कार्यवाही होत नसल्याने महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघाच्या अध्यक्षा यशश्री पाटील यांनी सहकाऱ्यांसमवेत आंदोलन सुरु करण्यात आले होते. मंगळवारी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी भेट देवून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापण्यात आलेल्या समितीमध्ये मंत्री, गृहसचिव, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, गृहनिर्माण विभागाचे कार्यकारी संचालक तसेच ५ आमदार आणि यशश्री पाटील, अनिता बागवे, वंदना राऊत, निर्मला भालेराव या विविध ठिकाणच्या पोलीस संघटनाच्या सदस्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)निवडणुकीत नाराजी टाळण्यासाठी समितीमुंबईसह प्रमुख शहरातील महापालिका, जिल्हा परिषदेच्या फेबु्रवारी महिन्यात निवडणूका होत आहे. राज्यभरात पोलीस कुटुंबियांचे आंदोलन सुरु असून त्याचा फटका निवडणुकीत बसू नये, यासाठी राज्य सरकारने आचारसंहिता लागू होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी त्याबाबतच्या समितीची स्थापना केली आहे. च्या समितीने पोलीस कुटुंबियांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन करावयाचे, एवढी कार्यकक्षा घालून दिली असून त्यासाठी ठराविक कालावधी निश्चित केलेला नाही.