शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

वक्फ घोटाळ्याच्या चौकशीकरिता समिती

By admin | Updated: May 9, 2015 01:18 IST

राज्यातील वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्यातील जमिनी पुन्हा ताब्यात घेण्याकरिता व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता राज्याचे मुख्य सचिव

मुंबई : राज्यातील वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्यातील जमिनी पुन्हा ताब्यात घेण्याकरिता व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची स्थापना केल्याचे अल्पसंख्याक कल्याण विभागाच्या प्रधान सचिव जयश्री मुखर्जी यांनी सांगितले.राज्यातील वक्फ जमीन घोटाळ्याची चौकशी करण्याकरिता शेख समितीची घोषणा केलेली होती. या समितीचा अहवाल सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला. त्या अहवालानुसार ज्या वक्फच्या जमिनी पुन्हा ताब्यात घेणे शक्य आहे ती कार्यवाही करण्याकरिता तसेच या घोटाळ्यात अडकलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याकरिता ही उच्चाधिकार समिती स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले.अल्पसंख्याक विभागात जे अधिकारी व कर्मचारी प्रतिनियुक्तीवर नियुक्त केले होते त्यांच्यावर त्यांच्या मूळ खात्याकडून कारवाई केली जाईल, असे मुखर्जी यांनी सांगितले. अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाले असतील तर पुढील चार वर्षांत त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. तसेच वक्फ जमिनींच्या प्रॉपर्टी कार्डांवर नोंद प्रतिबंधित सत्ता प्रकार अशी नोंद केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)