शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

सागरी किनाऱ्यांच्या विकासासाठी समिती

By admin | Updated: October 20, 2015 02:51 IST

राज्याला तब्बल ७२० किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभूनही पायाभूत सुविधांच्या अभावी पर्यटक आकर्षित होत नाहीत. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला पूरक वातावरणनिर्मिती करण्यासाठी

- जमीर काझी,  मुंबईराज्याला तब्बल ७२० किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभूनही पायाभूत सुविधांच्या अभावी पर्यटक आकर्षित होत नाहीत. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला पूरक वातावरणनिर्मिती करण्यासाठी राज्य सागरमाला समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीमध्ये बंदरे विभागाच्या राज्यमंत्र्यांसह सहा वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.बंदरांचे आधुनिकीकरण व जागतिक दर्जाच्या नवीन बंदरांची निर्मिती करण्याला यात प्रामुख्याने प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामागे व्यापाराबरोबरच पर्यटन व्यवसायाची वृद्धी व्हावी, हा प्रमुख उद्देश असल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.राज्यातील किनाऱ्यावरील बंदरे गृह विभागाच्या अखत्यारीत आहेत. परंतु ‘२६/११’च्या घटनेनंतर त्या ठिकाणच्या पायाभूत सुविधांपेक्षा सुरक्षेबाबत अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले. पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक साधनसुविधांची कमतरता असल्याने अनेक निसर्गरम्य ठिकाणे असूनही पर्यटक येत नसल्याची बाब समोर आली होती. नव्याने स्थापन करण्यात अलेल्या समितीतर्फे किनारपट्टीचा अधिकाधिक वापर करून आर्थिक विकास करण्यावर भर दिला जाणार आहे. माल वाहतुकीच्या दृष्टीने देशातील विविध बंदरे जोडण्याकरिता रस्ते व रेल्वे जोडणी प्रकल्पाचाही समावेश असणार आहे. सागरमाला समितीचे उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री रणजीत पाटील आहेत. त्याशिवाय बंदरे, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, महसूल व पर्यटन विभागाचे अपर सचिव / प्रधान सचिव / सचिव यापैकी एक जण त्याचप्रमाणे महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य म्हणून असणार आहेत. समितीला या कार्यक्रमाबाबत विशेष मार्गदर्शन तत्त्वे बनविणे, सल्ला देणे, प्रकल्पाची निवड, त्याच्या अंमलबजावणीचा प्राधान्यक्रम निश्चित करणे, त्याचप्रमाणे संबंधित विभागांमध्ये धोरणात्मक समन्वय साधन्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. सागरमाला समितीकडून बंदर विषयक पायाभूत सुविधांबरोबरच बंदरांच्या प्रभावक्षेत्रांमध्ये इंडस्ट्रीयल लॉजिस्टीक्स पार्क, वेअरहाउसिंग, उत्पादन केंद्रे, मेरिटाइम झोन्स अ‍ॅण्ड सर्व्हिसेस, स्मार्ट सिटी आदींचा विकास केला जाईल. त्यासाठीचे प्रकल्प प्राधान्याने सार्वजनिक-खासगी सहभाग तत्त्वावर (बीओटी) व आवश्यक त्या ठिकाणी खासगी क्षेत्राच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.