शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या विकासासाठी कटिबद्ध!

By admin | Updated: December 7, 2015 02:06 IST

समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबई : समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर येथील चैत्यभूमीला भेट दिली. डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली, तसेच ‘त्रिशरण पंचशील’ प्रार्थनाही केली. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ‘राज्यातील शोषित, पीडित यांचा विकास करून समाजातील शेवटच्या वर्गातील व्यक्तीचा विकास करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. त्यासाठी समतेचे राज्य निर्माण करण्याचा संकल्प करू या,’ असे आवाहनही त्यांनी केले. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यस्तूपावर राज्य शासनाच्या वतीने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळाचे लोकार्पणडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळाचे आणि फेसबुक पेजचे लोकार्पण करण्यात आले आहे. दादर येथील चैत्यभूमीवर पार पडलेल्या या सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसह सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘संकेतस्थळ आणि फेसबुक पेजमुळे सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे देशाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा संदेश दिला आहे. संविधानातील हा संदेश आणि एकात्मतेच्या बळावरच राज्याची आणि पर्यायाने देशाची प्रगती करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.