शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

बांधिलकी जपणारा माणूस!

By admin | Updated: May 27, 2017 06:19 IST

नितीन गडकरी हा एक वेगळा माणूस आहे. भाजपात ते अनेक वर्षांपासून आहेत. मंत्रिमंडळात काम करणाऱ्यावरच खरी जबाबदारी असते. त्याला अनेक गोष्टी पार पाडाव्या लागतात.

- मनोहर जोशीनितीन गडकरी हा एक वेगळा माणूस आहे. भाजपात ते अनेक वर्षांपासून आहेत. मंत्रिमंडळात काम करणाऱ्यावरच खरी जबाबदारी असते. त्याला अनेक गोष्टी पार पाडाव्या लागतात. माझ्या मंत्रिमंडळातील नितीन गडकरी म्हणजे जबाबदारीने वागणारा, उत्साहाने वागणारा, काहीतरी घडवू पाहणारा असे व्यक्तिमत्त्व होते. खरे सांगायचे, तर हे मंत्रिपद म्हणजे तारेवरची कसरतच असते. फार थोडे मंत्री हे काहीतरी घडवायला उत्सुक असतात. त्यासाठीच ते या मार्गावर आलेले असतात. उरलेले बहुतांश तर या मंत्रिपदामुळे मिळणाऱ्या सोईसुविधा मिळाव्यात, ती सत्ता अनुभवता यावी, म्हणूनच झटत असतात. गडकरी मात्र, काहीतरी घडवू पाहणाऱ्या गटातील होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. गडकरी आणि मला जवळ आणणारा एक विषय म्हणजे मुंबई-पुणे रस्ता. अशा प्रकारचा रस्ता व्हावा, ही माझीही मुख्यमंत्री म्हणून इच्छा होती. आपल्या व्यवस्थेत अनेक विषयाचे अंतिम अधिकार हे मुख्यमंत्र्याकडे असतात. तसे तो विषय माझ्याकडेही होता. गडकरी त्या खात्याचे प्रमुख होते. सार्वजनिक बांधकाम खाते त्यांच्याकडे होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या कालावधीत गडकरी यांच्याविरोधात माझ्याकडे एकही तक्रार आली नाही. एरव्ही अशा प्रकारचे खाते असेल, तर तक्रारींचा ओघच सुरू असतो, पण गडकरींबाबत असे घडले नाही. त्यांना अशा गोष्टीत रसच नव्हता. त्यांच्यात एक बांधिलकी होती. ते संघाचे आहेत. संघ बांधिलकी जपणाऱ्यांची संघटना आहे. ही बांधिलकी गडकरींमध्येही पाहायला मिळते. जेव्हा मुंबई-पुणे महामार्ग पूर्ण होत आला, तेव्हा मात्र, एका वेगळ्याच विषयाची चर्चा सुरू झाली. ती म्हणजे, हा महामार्ग नेमका कोणाचा? पत्रकारांनीही त्या वेळी या विषयाला महत्त्व दिले आणि त्याची चर्चा घडविली. त्या वेळी गडकरी यांनीच एका पत्रकाराला सांगितले की, ‘जर मुख्यमंत्री माझ्याबरोबर नसते, तर इतक्या झपाट्याने हा रस्ता झालाच नसता.’ हे गडकरी यांचे शब्द आहेत. सरकारमध्येही अनेक बंधन असतात. कसरत करावी लागते. मंत्री आणि मित्र अशा दोन्ही भूमिका आणि व्यक्तिमत्त्व मला गडकरी यांच्यामध्ये आढळले. मुंबई-पुणे रस्त्याच्या निमित्ताने पुढे अनेकांनी आमच्यात अंतर आणायचा अनेक लोकांनी प्रयत्न केला, पण गडकरी आणि माझ्यात त्यामुळे दुरावा निर्माण झाला नाही. तेव्हापेक्षा आता गडकरी यांचे स्थान मोठे आहे. त्यांचा परीघ वाढला आहे. पूर्वीपेक्षा ते आता अधिक प्रभावीपणे काम करू शकतात. मीही केंद्रात मंत्री होतो. नितीन गडकरी यांनी त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी मला संधी द्यावी, अशी माझी इच्छा आहे.