शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

आयुक्तांनी टोचले ‘बालकल्याण’चे कान

By admin | Updated: July 23, 2016 02:41 IST

आयुक्तांनी वेसण घालत अधिनियमाच्या चौकटीत राहून बालगृहातील मुलांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत कान टोचले आहेत.

मुंबई : बाल न्याय (मुलाची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ मधील कलम २ (१४)चा चुकीचा अर्थ काढून बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलामुलींना सरसकट हुसकावून लावण्याच्या राज्यातील बालकल्याण समित्यांच्या धडक मोहिमेला महिला व बालविकास आयुक्तांनी वेसण घालत अधिनियमाच्या चौकटीत राहून बालगृहातील मुलांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत कान टोचले आहेत.गुरुवारी (२१ जुलै) महिला व बालविकास आयुक्तांनी राज्यातील सर्व बालकल्याण समित्यांना पत्र पाठवून मुलांचा प्रवेश नाकारण्याच्या बालकल्याण समितीच्या कृतीचा समाचार घेताना अधिनियमाच्या कलम २ (१४) मधील १२ पोट कलमातील व्याख्येत बसणाऱ्या मुलांना प्रवेश देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. बाल न्याय अधिनियम २०१५च्या अनुषंगाने महिला व बालविकास आयुक्तांनी १ जून २०१६ला परिपत्रक पाठवून बालकल्याण समितीच्या कार्यपद्धतीवर कोरडे ओढले होते. यामुळे दुखावलेल्या बालकल्याण समितीने थेट बालगृहांवर व पयार्याने काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांवर राग काढून अनाथ मुलांनाच यापुढे बालगृहांत प्रवेश देत अन्य मुलांचे प्रवेश रद्द करण्याचे आडमुठे धोरण राबवले. परिणामी राज्यातील ७५० स्वयंसेवी बालगृहांतील ७० हजारांवर बालके अक्षरश: निराधार झाली. दरम्यान, बालकल्याण समितीच्या व आयुक्तालयाच्या दुटप्पी धोरणाच्या विरोधात बालगृह चालकांनी आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन छेडले. विरोधकांनीही हा विषय अधिवेशनात उपस्थित केल्याने बालविकास मंत्री पंकजा मुंडेंना स्पष्टीकरण द्यावे लागले. त्या पार्श्वभूमीवर पुणेस्थित महिला व बालविकास आयुक्तांनी अखेर २१ जुलैला पत्र पाठवून बालकल्याण समित्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बालगृह चालक व कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रवींद्रकुमार जाधव यांनी दिली. (प्रतिनिधी)>प्रवेश रद्द करण्याचे आडमुठे धोरण बालकल्याण समितीने थेट बालगृहांवर व पयार्याने काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांवर राग काढून अनाथ मुलांनाच यापुढे बालगृहांत प्रवेश देत अन्य मुलांचे प्रवेश रद्द करण्याचे आडमुठे धोरण राबवले. परिणामी राज्यातील ७५० स्वयंसेवी बालगृहांतील ७० हजारांवर बालके अक्षरश: निराधार झाली.