शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मीरा-भार्इंदरसाठी पोलीस आयुक्तालय

By admin | Updated: June 15, 2017 02:04 IST

मीरा-भार्इंदर शहरासाठी लवकरात लवकर पोलीस आयुक्तालय आणि विशेष बाब म्हणून स्वतंत्र तहसील कार्यालय स्थापन करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मीरा-भार्इंदर शहरासाठी लवकरात लवकर पोलीस आयुक्तालय आणि विशेष बाब म्हणून स्वतंत्र तहसील कार्यालय स्थापन करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. मीरा-भार्इंदर शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांसदर्भात सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. महानगरपालिकेने पोलीस आयुक्तालयास जागा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले असल्याने यासंदर्भात पुढील कार्यवाही तत्काळ करण्यात यावी. स्वतंत्र तहसील कार्यालय स्थापनेसाठी प्रस्ताव द्यावा त्यास विशेष बाब म्हणून तत्काळ मान्यता देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या वेळी स्थानिक आमदार नरेंद्र मेहता, महापौर गीता जैन यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दहिसर ते मीरा-भार्इंदर मेट्रो मार्ग, शहरातील जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न, शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, सूर्या धरणाच्या पाणी योजनेचे उद्घाटन आदी प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली. दहिसर ते मीरा-भार्इंदर मेट्रो मार्गाचा प्रस्ताव ३० जूनपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीसमोर आणण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली. जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी अशा इमारती तीस वर्षांपूर्वीच्या असण्याची अट आहे. जुन्या इमारतींसाठीचे हे धोरण २५ वर्षांचे करता येईल का, याबाबत तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले. शिवाय, इमारती लवकर कशा धोकादायक होतात याचा तपास करून अशा बांधकाम व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. शहरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यासाठी महापालिकेने एमएमआरडीएकडे प्रस्ताव दिल्यास पालिकेच्या आर्थिक क्षमतेनुसार कर्ज देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सूर्या धरणातून २९९ एम.एल.डी. पाणी योजनेच्या भूमिपूजनाची तारीख लवकरच घोषित करण्यात येईल. पाण्याची आवश्यकता असणाऱ्या महापालिकांनी त्यांच्याकडील सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करून ते पाणी एमआयडीसीला दिल्यास एमआयडीसीसाठीचे राखीव पाणी अशा महापालिकांना उपलब्ध करून देता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सांगितले. शहरासाठी मंजूर ७५ एम.एल.डी. योजना पूर्ण झाली असल्याने ते पाणी देण्याबाबत कार्यवाही त्वरित पूर्ण करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागांना दिल्या.‘एनए’साठी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडणारमीरा-भार्इंदरमध्ये प्रलंबित अकृषक (एनए) परवानगी देण्याबाबतचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. २७ जून रोजी याबाबतची सुनावणी असून, स्थगिती उठविण्यासाठी सरकार प्रभावीपणे बाजू मांडेल. या सुनावणीत स्थगिती न उठल्यास जमीन मालकाचे शपथपत्र घेऊन मनपाने परवानगी देण्यासंदर्भात पुढील कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.