शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

विकासनिधीला आयुक्तांची कात्री

By admin | Updated: May 13, 2017 01:35 IST

महापालिका अर्थसंकल्पात ११ हजार ९११ कोटींची कपात केल्यानंतर आयुक्त अजय मेहता यांनी विकासनिधीलाही कात्री लावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिका अर्थसंकल्पात ११ हजार ९११ कोटींची कपात केल्यानंतर आयुक्त अजय मेहता यांनी विकासनिधीलाही कात्री लावली आहे. स्थायी समिती सदस्यांनी सुचवलेल्या विकास कामांसाठी राखीव निधीत गतवर्षीच्या तुलनेत थेट दीडशे कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांना ३५० कोटींच्या निधीवरच समाधान मानावे लागले आहे. अर्थसंकल्पात विकासाचे फुगे फुगविण्यात आले, तरी त्यावर जेमतेम २५ ते ३० टक्केच अंमल होत आहे. यामुळे आवश्यक तेवढ्याच प्रकल्पांसाठी तरतूद करीत, अर्थसंकल्पात सुमारे १२ हजार कोटींची कपात करण्यात आली. आयुक्तांच्या या पारदर्शक अर्थसंकल्पात नगरसेवकांनी सुचवलेल्या विकासकामांनाही हातचे राखूनच निधी वाटण्यात आला आहे. सन २०१७-२०१८ या आर्थिक वर्षातील २५ हजार १४१ कोटींच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीची मंजुरी देताना विकास निधीतील कपातीचा निर्णयही सदस्यांनी निमूट स्वीकारला.सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात ३७ हजार कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला होता. यामध्ये यंदा कपात झाली. त्याप्रमाणे, गतवर्षी मंजूर झालेला ५०० कोटी रुपये विकास निधीही या वेळेस ३५० कोटी रुपयांवर आणण्यात आला आहे. यामध्ये सत्ताधारी शिवसेनेच्या वचननाम्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भाजपाच्या पारदर्शक कारभारावरच पावले टाकत चाललेल्या या अर्थसंकल्पावर सत्ताधारी व विरोधकांनी हरकत घेतली नाही. यासाठी केली काटकसर...अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीचा योग्य वापर होत नाही. निधी शिल्लक राहतो. त्यामुळे काटकसर हे तत्त्व समोर ठेवून विकास निधीची तरतूद केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कामे चोख करण्याची जबाबदारी सोपविली आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा अर्थसंकल्पातील विकासकामे आणि विकास आराखडा या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर मांडल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. जेवढे काम तेवढा निधी हेच धोरण ठेवले असून, कोणत्याही विकास कामासाठी निधी लागल्यास तो दिला जाईल, अशी भूमिका आयुक्तांनी घेतला आहे. संख्याबळ अधिक असल्याने शिवसेनेला विकास निधीतील मोठा वाटा आतापर्यंत मिळत होता. त्यामुळे शिवसेना त्या वेळीचा मित्र भाजपाच्या हातावर तुरी देत मोठा वाटा आपल्याकडे खेचून आणत असे. मात्र, युती तुटल्यानंतर स्वबळावर निवडणूक लढवून भाजपाने ८२ जागांवर विजय मिळवला. ही ताकद वाढल्यामुळे भाजपाचा महापालिकेतील आवाजही वाढला आहे. विकास निधीमध्ये समान वाटा मिळण्याची मागणी भाजपातून पुढे आली आहे. परिणामी, विकास निधीवरून शिवसेना-भाजपात वाद होण्याची शक्यता आहे.