शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, १ तासांत सर्व GR काढा, मग अंतिम निर्णय सांगतो: मनोज जरांगे पाटील
3
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
4
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
5
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
6
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
7
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
8
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
9
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
10
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
11
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
12
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
13
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर
14
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
15
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
16
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
17
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
18
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
19
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
20
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!

कमेंट, लाइक केलेल्या ३५ जणांची सुटका?

By admin | Updated: March 25, 2015 00:26 IST

एखाद्या घटनेवर इतरांना न पटणारं किंवा वेगळं मत व्यक्त केल्यास प्रसंगी ते आक्षेपार्ह ठरवून पोलिसांना गुन्हा दाखल करता येऊ शकणारे ६६ अ कलम मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले.

पुणे : एखाद्या घटनेवर इतरांना न पटणारं किंवा वेगळं मत व्यक्त केल्यास प्रसंगी ते आक्षेपार्ह ठरवून पोलिसांना गुन्हा दाखल करता येऊ शकणारे ६६ अ कलम मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले. पुण्यात ६६ अअंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या अनेकांची यातून मुक्तता होणार आहे. गेल्या ५ वर्षांत साधारणत: ३५ जणांविरुद्ध ६६ अ खाली गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यामध्ये सायबर क्राइमच्या गुन्हयात पुणे आघाडीवर आहे. गेल्या वर्षभरात (२०१४) पुण्यात सायबर क्राइमचे १०५ गुन्हे दाखल झाले आहेत, त्यापैकी ११ गुन्हयांमध्ये ६६ अ कलम लावण्यात आले आहे. ज्यांच्याविरुद्ध केवळ ६६ अ कलम लावले असेल त्यांच्यावरील गुन्हा आपोआप रद्द होईल. मात्र ६६ अ बरोबर इतर कलमेदेखील गुन्हयात लावली असल्यास ते वगळून इतर गुन्हयांची कारवाई सुरू राहणार आहे. सोशल मीडियावरील पोस्टला लाइक करणे किंवा त्यावर मत व्यक्त केल्याबद्दल ६६ अअंतर्गत गुन्हे दाखल झाले असतील तर ते रद्दबातल होणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारे गुन्हा दाखल झालेल्या पुण्यातील अनेकांना यातून सुटका होणार आहे. मात्र त्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होण्याचीही भीती व्यक्त होत आहे. दिवसेंदिवस सायबर गुन्हयांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियातून एक बनावट व्हिडीओ सर्वत्र पसरल्याने मणिपुरी तरुणांवर हल्ले होण्याच्या घटना देशभरात घडल्या. व्हिडीओ, त्यावरील कमेंट इतक्या वेगाने पसरत होते, की त्याला रोख लावणे पोलिसांच्या आवाक्याबाहेरचे बनले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी व्हिडीओ टाकणारे शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्या रोखणे शक्य झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने फेसबुक, व्टिटरवर मत व्यक्त करण्याचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य कायम ठेवले असले तरी सामाजिक तणाव निर्माण करू शकणाऱ्या, दोन देशांमध्ये वैमनस्य निर्माण होऊ शकेल, अशा पोस्ट टाकता येणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)पोलिसांची कसोटी लागणार४फेसबुक, टिष्ट्वटरवर टाकलेली पोस्ट, कमेंट सामाजिक तणाव निर्माण करणारी आहे किंवा नाही हे पोलिसांना ठरवावे लागणार आहे. याचा निर्णय घेणे पोलिसांसाठी मोठे जिकिरीचे ठरणार आहे. एखाद्या प्रकरणात पोलिसांनी वादग्रस्त पोस्ट टाकल्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यास त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे अशा प्रसंगात पोलिसांची कसोटी लागणार आहे.