शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील रस्त्यांची चाळण येऊन बघा

By admin | Updated: July 18, 2016 03:26 IST

निवडणुकीदरम्यान प्रचार करताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँक्रिटच्या रस्त्यांची पाहणी केल्यानंतर मनसेला उद्देशून ‘आता बोलवा रस्त्यातील खड्ड्यांचे फोटो काढून प्रदर्शन भरवणाऱ्यांना आणि काढा

डोंबिवली : निवडणुकीदरम्यान प्रचार करताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँक्रिटच्या रस्त्यांची पाहणी केल्यानंतर मनसेला उद्देशून ‘आता बोलवा रस्त्यातील खड्ड्यांचे फोटो काढून प्रदर्शन भरवणाऱ्यांना आणि काढा आमच्या रस्त्यांचे फोटो’, ‘बघा किती चकाचक झाले आहेत रस्ते’ असे म्हटले होते. पण, आजही काही वेगळी परिस्थिती नाही. खड्डे आहे तसेच आहेत, असे खरमरीत पत्र मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिले आहे.मुळात आघाडी सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेमधून मिळालेल्या तीन हजार कोटींच्या निधीमुळे कल्याण-डोंबिवलीचे रस्ते काँक्रिटचे होत आहेत. आघाडी पक्षाच्या स्थानिक पातळीवरील निष्क्रियतेमुळे सेनेने फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले नगरसेवक विश्वनाथ राणे अधिक स्पष्टपणे सांगितले. कारण, ते नेहमी सभागृहात सेनेविरोधात पोटतिडकीने आघाडी सरकारची भूमिका मांडायचे. परंतु, कल्याण-डोंबिवलीतील भ्रष्ट व नियोजनशून्य कामामुळे रस्त्यांचे काम सहा वर्षे रखडत चालले आहे. ही गोष्ट तुम्हीही नाकारू शकत नाही, असा आरोप कदम यांनी केला. सहा वर्षांपूर्वी रात्री १२ वाजता मानपाडा रस्त्याच्या दुरुस्ती कामाला प्रारंभ केला होता. नागरिकांना चांगली सुविधा मिळावी, यासाठी आपण नेहमीच दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करता. परंतु, येथील लोकप्रतिनिधींनी नागरिकांची उपेक्षाच केली आहे, हे तर कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील सर्वच अर्धवट प्रकल्पांमधून व रखडलेल्या रस्त्याच्या कामांमधून दिसून येते, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. कंत्राटदारांच्या हितासाठी नाही तर नागरिकांच्या हितासाठी दिवसरात्र नाही, पण निदान दिवसातील काही वेळ देऊन चांगले रस्ते करायला सांगा. एवढीच अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आम्ही नागरिकांच्या बाजूने बोलायचे नाही का? त्यांचा आवाज, त्यांचे दु:ख, त्यांच्या समस्या फोटोच्या माध्यमातून मांडायच्या नाहीत का? तुम्ही हीच गोष्ट सत्तेतील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना ओरडून सांगा की, ‘काम असे करा की, मनसेने तुमच्या चांगल्या कामाचे फोटो प्रदर्शन भरवले पाहिजे’ मग आम्हीसुद्धा चांगल्या कामाला दाद देणारे व वेळेला चांगल्या कामासाठी मदत करणारे आहोत, असेही या पत्रात म्हटले आहे.