शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
5
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
6
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
7
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
8
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
9
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
10
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
11
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
12
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
13
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
14
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
15
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
16
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
17
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
18
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

स्मृती इराणी यांच्या प्रतिमेचे दहन

By admin | Updated: June 2, 2015 02:16 IST

चेन्नई आयआयटीतील आंबेडकर-पेरियार या विद्यार्थी संघटनेवरील बंदीचा निषेध करीत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय मनुष्यबळ

मुंबई : चेन्नई आयआयटीतील आंबेडकर-पेरियार या विद्यार्थी संघटनेवरील बंदीचा निषेध करीत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या प्रतिमेचे दहन केले. केंद्र सरकारवर टीका केली म्हणून दलित विद्यार्थ्यांच्या गटावर बंदी घालणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील घाला आहे असून, या विद्यार्थ्यांवरील बंदी त्वरित उठवावी, अशी मागणी रिपाइंचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष व माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत केली. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या निर्देशानंतर चेन्नई आयआयटीच्या प्राचार्यांनी या गटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. देशभरातून या विरोधात आवाज उठवला जात आहे. केवळ केंद्र सरकारवर व त्यांच्या धोरणांवर टीका केल्याने बंदी घालणे ही अत्यंत चुकीची बाब आहे. देशाच्या संविधानाने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे़ बोलण्याचा अधिकार हा लोकशाहीचा आत्मा आहे. आंबेडकर-पेरियार गटावरील बंदी राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा आरोप खोब्रागडे यांनी केला. विद्यापीठे, आयआयटी अशी ठिकाणे विद्यार्थ्यांना आपले मत मांडण्याचे एक व्यासपीठ असते, त्यामुळे अशा प्रकारची बंदीची कारवाई रोखण्याची आवश्यकता आहे. दलित विद्यार्थ्यांच्या संघटनेवर अशाप्रकारे बंदी घालणे हे घटनाविरोधी आहे़ सरकारने असे प्रकार त्वरित रोखावेत व यापुढे असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. सदर विद्यार्थी गटावरील बंदीविरोधात रिपाइं तीव्र आंदोलन करेल, असा इशारा खोब्रागडे यांनी या वेळी दिला.