शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाविरुद्ध एकत्र लढा

By admin | Updated: September 7, 2015 01:38 IST

शरद पवार असतील.. नारायण राणे असतील.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील.. की कोणीही.. आता दुष्काळावर राजकारण नको.. तुमच्यात वितंडवाद नको..

दत्ता थोरे, लातूरशरद पवार असतील.. नारायण राणे असतील.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील.. की कोणीही.. आता दुष्काळावर राजकारण नको.. तुमच्यात वितंडवाद नको.. सगळे विरोधीपक्ष आणि सत्ताधारी पक्ष आणि आपण एकत्र येऊन या परिस्थितीशी झगडूयात. आता एकमेकांची उणीदुणी नको, असे आवाहन सिनेअभिनेता नाना पाटेकर यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केले आहे.नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘आपण सारे’च्या वतीने लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्णातील ११३ आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी १५ हजारांची मदत करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. गेल्या ११५ वर्षांतला हा सगळ्यात मोठा दुष्काळ आहे. कुणीतरी चुकत असेल त्याच्यावर बोट ठेवायला आपल्याला नंतर वेळ आहे. दौरा करायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन करावा. तुम्ही एक आहात म्हटल्यावर आम्ही समवेत येऊ, असे नाना पाटेकर म्हणाले.नाना पाटेकरांचा धीरगंभीर आवाज आणि मकरंद अनासपुरेंचे विनोद सोडून शेतकऱ्यांच्या सतावणाऱ्या चिंतेचे व्यवस्था व समाजाला विचारलेले प्रश्न यामुळे वातावरण भावूक झालेले. या कुटुंबियांना मंचावरही न बोलावता थेट त्यांच्या खुर्चीपर्यंत जाऊन नाना पाटेकरांनी धनादेश दिला आणि सोबतीला दिला जगण्याचा दुर्दम्य आशावाद व आत्महत्या न करण्याचा सल्ला.कुराणातील आत्महत्या करणेगुन्हा ही गोष्ट आवडते मला कुराणातील आत्महत्या करणे हा गुन्हा आहे; देवाशी प्रतारणा आहे, हे वचन मला खूप आवडते. त्यामुळे मुसलमान माणूस आत्महत्या करीत नाही. क्वचितच तुरळक झाल्या असतील. देव म्हणजे कोण? आपल्यातील ही माणसेच. त्यांना सोडून कसं जाता येईल ? आम्ही फक्त पोष्टमन...मी आणि मकरंद जरी पुढे असलो तरी हे पैसे आमचे नाहीत. लोकांमध्ये संवेदना आहेत. अनेक लोकांनी आम्हाला चेक्स दिले. पैसे दिले. आम्ही फक्त पोष्टमन आहोत. तुमच्यापर्यंत पोहोचवित आहोत. बाब पैशांची नाही तर आपल्याला आत ते जाणवतंय की नाही याची आहे, असे नाना म्हणाले.वेफर्सच्या पुड्यावरती किंमत असते. गुटखा-औषधांवर असते. फक्त आमच्या शेतकऱ्यांच्या मालावर किंमत छापलेली नसते. मी अडाणी माणूस आहे. शेतकरी आहे. एखादं पीक मेलं तर काय होतं याची मला जाणीव आहे. तुम्ही जे पिकवता त्याला हमी भाव ठरविता आला पाहीजे. कशाला काय भाव आहे हे आधीच माहीत झालं तर, मला हमीभाव पाहिजे की नाही. दुधाचा भाव १७ रुपयांनी घ्यायचा आणि बाजारात ७० रूपयाने विकायचा, हे का? असा सवाल नाना पाटेकर यांनी केला.