शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

दुष्काळाविरुद्ध एकत्र लढा

By admin | Updated: September 7, 2015 01:38 IST

शरद पवार असतील.. नारायण राणे असतील.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील.. की कोणीही.. आता दुष्काळावर राजकारण नको.. तुमच्यात वितंडवाद नको..

दत्ता थोरे, लातूरशरद पवार असतील.. नारायण राणे असतील.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील.. की कोणीही.. आता दुष्काळावर राजकारण नको.. तुमच्यात वितंडवाद नको.. सगळे विरोधीपक्ष आणि सत्ताधारी पक्ष आणि आपण एकत्र येऊन या परिस्थितीशी झगडूयात. आता एकमेकांची उणीदुणी नको, असे आवाहन सिनेअभिनेता नाना पाटेकर यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केले आहे.नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘आपण सारे’च्या वतीने लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्णातील ११३ आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी १५ हजारांची मदत करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. गेल्या ११५ वर्षांतला हा सगळ्यात मोठा दुष्काळ आहे. कुणीतरी चुकत असेल त्याच्यावर बोट ठेवायला आपल्याला नंतर वेळ आहे. दौरा करायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन करावा. तुम्ही एक आहात म्हटल्यावर आम्ही समवेत येऊ, असे नाना पाटेकर म्हणाले.नाना पाटेकरांचा धीरगंभीर आवाज आणि मकरंद अनासपुरेंचे विनोद सोडून शेतकऱ्यांच्या सतावणाऱ्या चिंतेचे व्यवस्था व समाजाला विचारलेले प्रश्न यामुळे वातावरण भावूक झालेले. या कुटुंबियांना मंचावरही न बोलावता थेट त्यांच्या खुर्चीपर्यंत जाऊन नाना पाटेकरांनी धनादेश दिला आणि सोबतीला दिला जगण्याचा दुर्दम्य आशावाद व आत्महत्या न करण्याचा सल्ला.कुराणातील आत्महत्या करणेगुन्हा ही गोष्ट आवडते मला कुराणातील आत्महत्या करणे हा गुन्हा आहे; देवाशी प्रतारणा आहे, हे वचन मला खूप आवडते. त्यामुळे मुसलमान माणूस आत्महत्या करीत नाही. क्वचितच तुरळक झाल्या असतील. देव म्हणजे कोण? आपल्यातील ही माणसेच. त्यांना सोडून कसं जाता येईल ? आम्ही फक्त पोष्टमन...मी आणि मकरंद जरी पुढे असलो तरी हे पैसे आमचे नाहीत. लोकांमध्ये संवेदना आहेत. अनेक लोकांनी आम्हाला चेक्स दिले. पैसे दिले. आम्ही फक्त पोष्टमन आहोत. तुमच्यापर्यंत पोहोचवित आहोत. बाब पैशांची नाही तर आपल्याला आत ते जाणवतंय की नाही याची आहे, असे नाना म्हणाले.वेफर्सच्या पुड्यावरती किंमत असते. गुटखा-औषधांवर असते. फक्त आमच्या शेतकऱ्यांच्या मालावर किंमत छापलेली नसते. मी अडाणी माणूस आहे. शेतकरी आहे. एखादं पीक मेलं तर काय होतं याची मला जाणीव आहे. तुम्ही जे पिकवता त्याला हमी भाव ठरविता आला पाहीजे. कशाला काय भाव आहे हे आधीच माहीत झालं तर, मला हमीभाव पाहिजे की नाही. दुधाचा भाव १७ रुपयांनी घ्यायचा आणि बाजारात ७० रूपयाने विकायचा, हे का? असा सवाल नाना पाटेकर यांनी केला.