शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

जागा भरण्यासाठी महाविद्यालयांची कसरत; सर्वांना मिळणार प्रवेश

By admin | Updated: June 28, 2016 04:00 IST

अकरावीच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेनंतरही सुमारे ४७ हजार ६४८ जागा रिक्त राहण्याची भीती मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयाने व्यक्त केली

मुंबई : अकरावीच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेनंतरही सुमारे ४७ हजार ६४८ जागा रिक्त राहण्याची भीती मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयाने व्यक्त केली आहे. यंदा अकरावी आॅनलाईन प्रवेशासाठी एकूण २ लाख २२ हजार ६२२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र मुळात अकरावी प्रवेशासाठी मुंबईतील महाविद्यालयांमध्ये २ लाख ६९ हजार १७२ जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे अकरावीच्या सुमारे ४७ हजार ६४८ प्रवेशाच्या जागा यंदाच्या शैक्षणिक वर्षात रिक्त राहण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र दुसरीकडे सर्व विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश मिळणार, ही पालकांसाठी आनंदाची बाब म्हणता येईल. रिक्त जागा भरण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नव्या महाविद्यालयांना विद्यार्थी संख्या भरण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल.कोट्यातील ४३,४९९ जागा समर्पितअकरावी प्रवेशासाठी आॅनलाईनच्या १ लाख ४९ हजार ८०८ जागांसोबत इनहाऊस, अल्पसंख्यांक आणि व्यवस्थापन कोट्यातील एकूण १ लाख १९ हजार ३६४ जागा उपलब्ध होत्या. मात्र कोट्यातील एकूण जागांपैकी ४३ हजार ४९९ जागा आॅनलाईनसाठी समर्पित आहेत. समर्पित जागांत इनहाऊसच्या १० हजार ७१७, अल्पसंख्यांकच्या ३१ हजार २० आणि व्यवस्थापन कोट्यातील १ हजार ७६२ जागा आहेत. त्यामुळे आत्ता आॅनलाईनसाठी उपलब्ध जागांची संख्या २ लाख ६९ हजार १७२ इतकी झाल्याचे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी सांगितले....तर ५० हजार जागा रिक्त अकरावी प्रवेशासोबतच अनेक विद्यार्थी आयटीआय आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. त्यात कोट्यातून प्रवेश मिळवलेल्या २८ हजार २३७ विद्यार्थ्यांचे नाव आॅनलाईनच्या पहिल्या कट आॅफमध्येही लागले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी प्रवेश घ्यावा लागेल. त्यामुळे अकरावीच्या रिक्त जागांची संख्या ५० हजारांवर जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)