शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

केंद्रीय प्रवेश नाकारण्यासाठी महाविद्यालयांची खेळी!

By admin | Updated: June 7, 2017 01:20 IST

शिक्षण संचालकांपर्यंत लॉबिंगचा प्रयत्न: केंद्रीय प्रवेश पद्धतीला महाविद्यालयांचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: येत्या शैक्षणिक वर्षात अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहेत. तसे नियोजनही शिक्षण विभागाने केले आहे; परंतु यात काही शिकवणी वर्ग संचालक आणि संस्थाचालक खोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्रीय पद्धतीने अकरावीचे प्रवेश होऊच नये, यासाठी शिक्षण संचालकांपर्यंत लॉबिंग करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दहावीचा निकाल लागल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडते. प्रवेश देण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांकडून आकर्षित प्रवेश अर्ज छापून २00 ते ३00 रुपये दराने त्याची विक्री केल्या जाते. या माध्यमातून कनिष्ठ महाविद्यालयांना लाखो रुपये प्राप्त होतात. तसेच अनेक शिकवणी वर्ग संचालकांनी स्वत:ची कनिष्ठ महाविद्यालये सुरू केली आहे. त्यांच्या शिकवणी वर्गातील मुलांनी त्यांच्याच कनिष्ठ महाविद्यालय प्रवेश घ्यावा. यासाठी प्रयत्न करून डबल कमाई करतात; परंतु येत्या शैक्षणिक वर्षात अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने दोन महिन्यांपासून नियोजन सुरू केले. त्यासाठी शिक्षण संचालकांकडे प्रस्तावसुद्धा पाठविण्यात आला. केंद्रीय पद्धतीने प्रवेश होणार म्हटल्यावर शिकवणी वर्ग संचालकांसोबतच संस्थाचालकांचे धाबे दणाणले. केंद्रीय प्रवेश पद्धतीमुळे प्रवेशपत्र विक्री व डोनेशनच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईला आळा बसू शकतो आणि शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांना आपल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार नाही, अशी भीती काही शिकवणी वर्ग संचालकांना वाटू लागली. त्यामुळे अकोल्यातील ५३ कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने होऊच नये यासाठी काही शिकवणी वर्ग संचालक आणि संस्थाचालकांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि शिक्षण संचालकांपर्यंत लॉबिंग सुरू केली. त्यामुळे केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील प्रस्तावाला अद्यापपर्यंत मंजुरी मिळू शकलेली नाही, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. दहावी परीक्षा निकाल तोंडावर असतानाही शिक्षण संचालकांनी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यास परवानगी दिली. यामागे शिकवणी वर्ग संचालक आणि शिक्षण संस्थाचालकांचे सुरू असलेले प्रयत्न कारणीभूत असल्याची चर्चा आहे.