शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

स्वच्छता मोहिमेत ५५० टन कचरा गोळा

By admin | Updated: March 2, 2017 01:10 IST

रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे बुधवारी देशात भव्य प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

पुणे : रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे बुधवारी देशात भव्य प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते.पुणे शहरात ससून सर्वोपचार रुग्णालय, शासकीय तंत्रनिकेतन, महापालिका भवन, येरवडा मनोरुग्णालय, धनकवडी परिसर, कोथरूड परिसर, शिवाजीनगर पुणे जिल्हा न्यायालय या परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात १० हजार स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. या मोहिमेदरम्यान ५५० टन कचरा गोळा करण्यात आला, अशी माहिती धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर ‘स्वच्छ भारत’ अभियानची घोषणा केली होती. त्याला अनुसरून राज्यपालांनी डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांची स्वच्छ भारत अभियानाचे अग्रदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. पुणे शहरात सुमारे १० हजार, तर पुणे जिल्ह्यात सुमारे ३० हजार स्वयंसेवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. हे अभियान महाराष्ट्रासह विविध राज्यातील १४८ शहरांमध्ये राबविण्यात आले. सुमारे १,४३४ सरकारी कार्यालये, ११५ रेल्वे स्थानके व सुमारे २,७२० किलोमीटर लांबीचे शहरातील रस्ते, पोलीस ठाणे, सरकारी कार्यालये, बस स्थानके, रुग्णालये येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. हातमोजे, झाडू, मास्क, कचरा उचलण्याचे साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरवण्यात आले होते.(प्रतिनिधी)>कचऱ्याचे वर्गीकरण कराडॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले, ‘‘कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीबरोबरच टायफॉईड, मलेरिया, गॅस्ट्रो, कॉलरा यासारखे संसर्गजन्य आजार पसरतात. या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला आणि सरकारला मोठा आर्थिक खर्च करावा लागतो. अस्वच्छ वातावरणामुळे आजूबाजूच्या परिसरात प्रदूषण होते. हे सर्व टाळण्यासाठी जमा होणारा कचरा ठरवून दिलेल्या जागी नेऊन टाकला पाहिजे. ओला व सुका कचरा यांचे वर्गीकरण केले पाहिजे. प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर केला पाहिजे. आपण आपले घर आणि घराचा परिसर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपले शहर, गाव परिसर आणि देश स्वच्छ राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.