शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

स्वच्छता मोहिमेत ५५० टन कचरा गोळा

By admin | Updated: March 2, 2017 01:10 IST

रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे बुधवारी देशात भव्य प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

पुणे : रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे बुधवारी देशात भव्य प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते.पुणे शहरात ससून सर्वोपचार रुग्णालय, शासकीय तंत्रनिकेतन, महापालिका भवन, येरवडा मनोरुग्णालय, धनकवडी परिसर, कोथरूड परिसर, शिवाजीनगर पुणे जिल्हा न्यायालय या परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात १० हजार स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. या मोहिमेदरम्यान ५५० टन कचरा गोळा करण्यात आला, अशी माहिती धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर ‘स्वच्छ भारत’ अभियानची घोषणा केली होती. त्याला अनुसरून राज्यपालांनी डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांची स्वच्छ भारत अभियानाचे अग्रदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. पुणे शहरात सुमारे १० हजार, तर पुणे जिल्ह्यात सुमारे ३० हजार स्वयंसेवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. हे अभियान महाराष्ट्रासह विविध राज्यातील १४८ शहरांमध्ये राबविण्यात आले. सुमारे १,४३४ सरकारी कार्यालये, ११५ रेल्वे स्थानके व सुमारे २,७२० किलोमीटर लांबीचे शहरातील रस्ते, पोलीस ठाणे, सरकारी कार्यालये, बस स्थानके, रुग्णालये येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. हातमोजे, झाडू, मास्क, कचरा उचलण्याचे साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरवण्यात आले होते.(प्रतिनिधी)>कचऱ्याचे वर्गीकरण कराडॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले, ‘‘कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीबरोबरच टायफॉईड, मलेरिया, गॅस्ट्रो, कॉलरा यासारखे संसर्गजन्य आजार पसरतात. या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला आणि सरकारला मोठा आर्थिक खर्च करावा लागतो. अस्वच्छ वातावरणामुळे आजूबाजूच्या परिसरात प्रदूषण होते. हे सर्व टाळण्यासाठी जमा होणारा कचरा ठरवून दिलेल्या जागी नेऊन टाकला पाहिजे. ओला व सुका कचरा यांचे वर्गीकरण केले पाहिजे. प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर केला पाहिजे. आपण आपले घर आणि घराचा परिसर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपले शहर, गाव परिसर आणि देश स्वच्छ राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.