शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

राजकारणामुळे सहकार चळवळीचा ऱ्हास - उपराष्ट्रपती

By admin | Updated: July 8, 2016 21:05 IST

एकेकाळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सहकारी चळवळ मागे पडू लागली आहे. सहकारी चळवळ मूळ उद्दीष्टांपासून भरकटली असून सरकारच्या उद्दीष्टपूर्तीची साधन झाली आहे

उपराष्ट्रपती मो.हामिद अन्सारी : नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या ५५ वा स्थापना दिन साजरानागपूर : एकेकाळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सहकारी चळवळ मागे पडू लागली आहे. सहकारी चळवळ मूळ उद्दीष्टांपासून भरकटली असून सरकारच्या उद्दीष्टपूर्तीची साधन झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सहकार क्षेत्राचा राजकीय फायद्यासाठी वापर वाढला आहे. राजकारणामुळे सहकारी चळवळीचा ऱ्हास होत आहे, असे परखड मत देशाचे उपराष्ट्रपती मो.हामिद अन्सारी यांनी व्यक्त केले. नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या ५५ व्या स्थापना दिवस समारंभादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.देश घडवणाऱ्या नेत्यांनी सहकारी चळवळीकडे वेगाने आर्थिक विकास करण्याचे साधन म्हणून बघितले होते. स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काही दशकांत देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचा मौलिक वाटा होता. महाराष्ट्राने तर या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. परंतु त्यानंतर सहकार क्षेत्रातून काही ठराविक व्यक्तींनाच फायदा होत गेला. तळागाळातील सहकार कमकुवत होत गेला. आर्थिक उदारीकरणानंतर खासगीकरणाचे सहकारासमोर मोठे आव्हान उभे ठाकले. त्यातच प्राथमिक स्वरूपाच्या कृषी पतसंस्थांकडील साधनसामुग्रीची उणीव, व्यावसायिक व्यवस्थापन कौशल्याचा अभाव यामुळे सहकार क्षेत्र आणखी माघारत गेले, असे प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी केले. महाराष्ट्रात राजकीय नेत्यांमुळे सहकारी चळवळ चांगलीच फोफावली व सहकारी क्षेत्राने प्रचंड प्रगती केली. परंतु गुजरात, कर्नाटक वगळता देशाच्या इतर राज्यांत हे चित्र दिसले नाही. वंचितांचे जीवन सुधारण्यासाठी सहकारी बँकांनी मोठे योगदान दिले आहे. काही मोजक्या बँकांमुळे सहकारी बँकांबाबत गैरसमज आहेत. परंतु देशाच्या विकासात या क्षेत्राची मौलिक भुमिका आहे. रोजगार निर्माण करणाऱ्या आर्थिक धोरणाचा स्विकार करण्याची आमची भुमिका आहे, असे गडकरी म्हणाले. नागपुरातच देशाचे केंद्रब्रिटीशांच्या काळात नागपूर देशाच्या केंद्रस्थानी होते. आता देशाचे भौगोलिक केंद्र थोडे वेगळे असले तरी लोक नागपुरलाच खरे केंद्र मानतात असे प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी केले. त्यांचा रोख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे असल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला. विशेष म्हणजे संघाचे अनेक स्थानिक पदाधिकारी यावेळी श्रोत्यांमध्ये उपस्थित होते..