शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

राज्यात थंडीचा कडाका !

By admin | Updated: January 12, 2017 04:09 IST

संक्रातीच्या तोंडावर थंडीचा कडाका आणखी वाढला आहे. मुंबईसह मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात

पुणे : संक्रातीच्या तोंडावर थंडीचा कडाका आणखी वाढला आहे. मुंबईसह मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे़ बुधवारी सर्वात निच्चांकी तापमान नाशिक येथे ५.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुण्यातही ७़७ अंश सेल्सिअस असे हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली. येत्या दोन दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढेल, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.देशभरात थंडीचा कडाका वाढला असून पश्चिम राजस्थान, हरियाना, चंदीगड, दिल्ली, पंजाब येथे थंडीची लाट दिसून येत आहे़ हरियाना, पश्चिम राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी पारा शून्याच्या खाली गेला असून पंजाब व राजस्थानात काही ठिकाणी किमान तापमान २ अशांच्या खाली गेले आहे़ उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यालाही चांगलीच हुडहुडी भरली आहे.कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ४ ते ६ अंशांनी घट झाली आहे़ राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ७़७, अहमदनगर ७़१, जळगाव ८,कोल्हापूर १४, महाबळेश्वर १२, मालेगाव ७़४़, नाशिक ५़८, सांगली ११़५, सातारा १०, सोलापूर १०़७, मुंबई १७़४, अलिबाग १५़४, रत्नागिरी १६़३, पणजी १९, डहाणू १४़१, भिरा १३़३, उस्मानाबाद ८़४, औरंगाबाद ७़६, परभणी ९़५, नांदेड १२, बीड १४़४, अकोला ९़५़, अमरावती ९़२, बुलढाणा ९़८, ब्रम्हपुरी १३़२, चंद्रपूर १३़२, गोंदिया १०़८, नागपूर१२़८, वाशिम १२़६, वर्धा ११, यवतमाळ ९़४़ (प्रतिनिधी)पारा ५ अंशावर विदर्भातही काही ठिकाणी किमान तापमानात एकाच दिवसात ५ अंशांची घट झाली आहे़ राज्यात नाशिक सर्वाधिक थंडीचे शहर ठरले आहे. निफाड तालुक्यात तर थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून, पारा ५ अंशावर आल्याची शक्यता आहे.