शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

राज्यभरात थंडीची लाट

By admin | Updated: March 12, 2017 12:55 IST

उत्तरेकडील राज्यात पडत असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम राज्यातील तापमानावर झाला असून, अनेक ठिकाणच्या किमान तापमानात मोठी घट झाली

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 12 - उत्तरेकडील राज्यात पडत असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम राज्यातील तापमानावर झाला असून, अनेक ठिकाणच्या किमान तापमानात मोठी घट झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. उत्तरेकडे पर्वतीय भागात पुन्हा बर्फवृष्टी झाल्याने आणि मैदानी प्रदेशात पाऊस बरसल्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये पारा खाली घसरला आहे. थंड वाऱ्यांचा जोर वाढल्याने राज्यातील कमाल व किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे.महाबळेश्वर येथील किमान 9 अंश, पुणे 10.3 अंश, नाशिक 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मालेगाव येथे किमान तापमान 12.2, जळगाव 13.6, अमरावती 12.4, सांगली 13.5, अकोला 16, नागपूर 17.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेले काही दिवस शहरासह राज्यातील बहुतांश ठिकाणचे किमान तापमान घटले आहे. विदर्भातील काही ठिकाणी तीव्र थंडीची लाट पसरली आहे.(थंडीची लाट, उद्योगनगरी गारठली)विदर्भातील ही थंडीची लाट कायम आली असून, काही ठिकाणी तीव्र थंडी पडेल, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागातदेखील सरासरीच्या तुलनेत तापमानात घट झाली असून, उर्वरित राज्यातील किमान तापमानही सरासरीइतकेच आहे. थंडीची लाट असल्याने नागरिकांनी गरम कपडे घालणे पसंत केले आहे. ग्रामीण भागासह, शहरातही ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. अंगात गरम कपडे नसले तर अंगात लगेच हुडहुडी भरते आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.