शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

राज्यभरात थंडीची लाट

By admin | Updated: March 12, 2017 12:55 IST

उत्तरेकडील राज्यात पडत असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम राज्यातील तापमानावर झाला असून, अनेक ठिकाणच्या किमान तापमानात मोठी घट झाली

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 12 - उत्तरेकडील राज्यात पडत असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम राज्यातील तापमानावर झाला असून, अनेक ठिकाणच्या किमान तापमानात मोठी घट झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. उत्तरेकडे पर्वतीय भागात पुन्हा बर्फवृष्टी झाल्याने आणि मैदानी प्रदेशात पाऊस बरसल्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये पारा खाली घसरला आहे. थंड वाऱ्यांचा जोर वाढल्याने राज्यातील कमाल व किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे.महाबळेश्वर येथील किमान 9 अंश, पुणे 10.3 अंश, नाशिक 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मालेगाव येथे किमान तापमान 12.2, जळगाव 13.6, अमरावती 12.4, सांगली 13.5, अकोला 16, नागपूर 17.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेले काही दिवस शहरासह राज्यातील बहुतांश ठिकाणचे किमान तापमान घटले आहे. विदर्भातील काही ठिकाणी तीव्र थंडीची लाट पसरली आहे.(थंडीची लाट, उद्योगनगरी गारठली)विदर्भातील ही थंडीची लाट कायम आली असून, काही ठिकाणी तीव्र थंडी पडेल, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागातदेखील सरासरीच्या तुलनेत तापमानात घट झाली असून, उर्वरित राज्यातील किमान तापमानही सरासरीइतकेच आहे. थंडीची लाट असल्याने नागरिकांनी गरम कपडे घालणे पसंत केले आहे. ग्रामीण भागासह, शहरातही ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. अंगात गरम कपडे नसले तर अंगात लगेच हुडहुडी भरते आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.