शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

नाशिकला शीतसाखळी टर्मिनल मार्केट

By admin | Updated: December 28, 2015 03:56 IST

केंद्र शासनाने देशात टर्मिनल मार्केट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, राज्यात मुंबई, नाशिक व नागपूर येथे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती

नाशिक : केंद्र शासनाने देशात टर्मिनल मार्केट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, राज्यात मुंबई, नाशिक व नागपूर येथे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली. राज्य अथवा केंद्रीय फलोत्पादन अभियानातून उत्तर महाराष्ट्रात सात शीतसाखळी टर्मिनल मार्केट उभारण्याबाबतही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.केंद्र शासनाने फळे, भाजीपाला व इतर नाशवंत शेतमालाकरिता टर्मिनल मार्केटच्या उभारणीसाठी निविदाप्रक्रिया व खासगी उद्योजकांची निवड करण्यासंदर्भात एक समिती गठीत केली. त्या धर्तीवर राज्य शासनानेही अशी समिती गठीत करून कृषी पणन मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करून त्यांनी त्या समितीच्या मार्गदर्शनाखाली टर्मिनल मार्केटचे काम करावयाचे आहे. त्याचप्रमाणे फळे व भाजीपाल्याकरिता स्वतंत्र शीतसाखळी स्थापन करण्यात आलेली असून, नाशिक विभागातील नाशवंत फळांकरिता व भाजीपाल्यांकरिता वातानुकूलित वाहने, प्रिकुलिंग कोल्ड स्टोअरेज, रायपनिंग चेंबर आदींचा आवश्यकतेप्रमाणे समावेश असलेल्या सात शीतसाखळ्या स्थापन करण्यात येणार आहेत. शेतकरी फॉर्म पॅक हाउसला माल आणतील व त्यावर प्राथमिक प्रक्रिया व पॅकिंग करून वातानुकूलित वाहनाने माल समूह केंद्रात आणला जाईल. त्यानंतर तो ग्रेडिंग-पॅकिंग करून प्रिकुलिंग, कोल्ड स्टोअरेजला ठेवला जाईल व नंतर निर्यात केला जाईल, असे गोडसे यांनी सांगितले.प्रकल्पाकरिता सिद्धपिंप्री येथील १०० एकर जमिनीचा प्रस्ताव शसनाकडे २०१०मध्ये पाठविला होता. तो प्रलंबित होता. गोडसे यांनी मौजे वापगाव (ठाणे) व मौजे वारंगा (नागपूर) येथील धर्तीवर ही जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्याबाबत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे मागणी केली आहे. (प्रतिनिधी)