शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

नाशिकला शीतसाखळी टर्मिनल मार्केट

By admin | Updated: December 28, 2015 03:56 IST

केंद्र शासनाने देशात टर्मिनल मार्केट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, राज्यात मुंबई, नाशिक व नागपूर येथे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती

नाशिक : केंद्र शासनाने देशात टर्मिनल मार्केट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, राज्यात मुंबई, नाशिक व नागपूर येथे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली. राज्य अथवा केंद्रीय फलोत्पादन अभियानातून उत्तर महाराष्ट्रात सात शीतसाखळी टर्मिनल मार्केट उभारण्याबाबतही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.केंद्र शासनाने फळे, भाजीपाला व इतर नाशवंत शेतमालाकरिता टर्मिनल मार्केटच्या उभारणीसाठी निविदाप्रक्रिया व खासगी उद्योजकांची निवड करण्यासंदर्भात एक समिती गठीत केली. त्या धर्तीवर राज्य शासनानेही अशी समिती गठीत करून कृषी पणन मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करून त्यांनी त्या समितीच्या मार्गदर्शनाखाली टर्मिनल मार्केटचे काम करावयाचे आहे. त्याचप्रमाणे फळे व भाजीपाल्याकरिता स्वतंत्र शीतसाखळी स्थापन करण्यात आलेली असून, नाशिक विभागातील नाशवंत फळांकरिता व भाजीपाल्यांकरिता वातानुकूलित वाहने, प्रिकुलिंग कोल्ड स्टोअरेज, रायपनिंग चेंबर आदींचा आवश्यकतेप्रमाणे समावेश असलेल्या सात शीतसाखळ्या स्थापन करण्यात येणार आहेत. शेतकरी फॉर्म पॅक हाउसला माल आणतील व त्यावर प्राथमिक प्रक्रिया व पॅकिंग करून वातानुकूलित वाहनाने माल समूह केंद्रात आणला जाईल. त्यानंतर तो ग्रेडिंग-पॅकिंग करून प्रिकुलिंग, कोल्ड स्टोअरेजला ठेवला जाईल व नंतर निर्यात केला जाईल, असे गोडसे यांनी सांगितले.प्रकल्पाकरिता सिद्धपिंप्री येथील १०० एकर जमिनीचा प्रस्ताव शसनाकडे २०१०मध्ये पाठविला होता. तो प्रलंबित होता. गोडसे यांनी मौजे वापगाव (ठाणे) व मौजे वारंगा (नागपूर) येथील धर्तीवर ही जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्याबाबत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे मागणी केली आहे. (प्रतिनिधी)