शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

नाशिकला शीतसाखळी टर्मिनल मार्केट

By admin | Updated: December 28, 2015 03:56 IST

केंद्र शासनाने देशात टर्मिनल मार्केट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, राज्यात मुंबई, नाशिक व नागपूर येथे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती

नाशिक : केंद्र शासनाने देशात टर्मिनल मार्केट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, राज्यात मुंबई, नाशिक व नागपूर येथे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली. राज्य अथवा केंद्रीय फलोत्पादन अभियानातून उत्तर महाराष्ट्रात सात शीतसाखळी टर्मिनल मार्केट उभारण्याबाबतही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.केंद्र शासनाने फळे, भाजीपाला व इतर नाशवंत शेतमालाकरिता टर्मिनल मार्केटच्या उभारणीसाठी निविदाप्रक्रिया व खासगी उद्योजकांची निवड करण्यासंदर्भात एक समिती गठीत केली. त्या धर्तीवर राज्य शासनानेही अशी समिती गठीत करून कृषी पणन मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करून त्यांनी त्या समितीच्या मार्गदर्शनाखाली टर्मिनल मार्केटचे काम करावयाचे आहे. त्याचप्रमाणे फळे व भाजीपाल्याकरिता स्वतंत्र शीतसाखळी स्थापन करण्यात आलेली असून, नाशिक विभागातील नाशवंत फळांकरिता व भाजीपाल्यांकरिता वातानुकूलित वाहने, प्रिकुलिंग कोल्ड स्टोअरेज, रायपनिंग चेंबर आदींचा आवश्यकतेप्रमाणे समावेश असलेल्या सात शीतसाखळ्या स्थापन करण्यात येणार आहेत. शेतकरी फॉर्म पॅक हाउसला माल आणतील व त्यावर प्राथमिक प्रक्रिया व पॅकिंग करून वातानुकूलित वाहनाने माल समूह केंद्रात आणला जाईल. त्यानंतर तो ग्रेडिंग-पॅकिंग करून प्रिकुलिंग, कोल्ड स्टोअरेजला ठेवला जाईल व नंतर निर्यात केला जाईल, असे गोडसे यांनी सांगितले.प्रकल्पाकरिता सिद्धपिंप्री येथील १०० एकर जमिनीचा प्रस्ताव शसनाकडे २०१०मध्ये पाठविला होता. तो प्रलंबित होता. गोडसे यांनी मौजे वापगाव (ठाणे) व मौजे वारंगा (नागपूर) येथील धर्तीवर ही जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्याबाबत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे मागणी केली आहे. (प्रतिनिधी)