शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

परवाने नूतनीकरणाला थंड प्रतिसाद

By admin | Updated: November 21, 2015 02:54 IST

नूतनीकरण न करणाऱ्यांचे परवाने कायमचे रद्द केले जातील, असा कठोर इशारा परिवहन विभागाने देऊनही त्याकडे रिक्षा चालकांनी दुर्लक्षच केल्याचे चित्र आहे. राज्यातील १ लाख

मुंबई : नूतनीकरण न करणाऱ्यांचे परवाने कायमचे रद्द केले जातील, असा कठोर इशारा परिवहन विभागाने देऊनही त्याकडे रिक्षा चालकांनी दुर्लक्षच केल्याचे चित्र आहे. राज्यातील १ लाख ४0 हजार ६५ पैकी अवघ्या १५ हजार रिक्षांच्या परवान्यांचे नूतनीकरण झाले असून परिवहन विभागावरच नामुष्कीची वेळ आली आहे. नूतनीकरणासाठी अवघे दहा दिवस शिल्लक असून परिवहन विभाग आता कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. राज्यातील १ लाख ४0 हजार ६५ रिक्षांचे परवाने विविध कारणास्तव रद्द झाले होते. अशा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय १ आॅक्टोबर रोजी घेण्यात आला आणि ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली. त्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये २0 हजार आणि इतर क्षेत्रामध्ये १५ हजार सहमत शुल्क लागू करण्याबाबत सर्व परिवहन प्राधिकरणांना निर्देश देण्यात आले. नूतनीकरणाला थंड प्रतिसाद मिळाल्याने रिक्षा या प्रक्रियेसाठी १६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आणि नूतनीकरण न केल्यास परवाने कायमचे रद्द केले जातील, असा कठोर इशाराही दिला. दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे ३0 नोव्हेंबरपर्यंत नूतनीकरणाची मुदत वाढवण्यात आली. नूतनीकरण करण्यात आलेल्या परवान्यांमध्ये सर्वाधिक मुंबईतील अंधेरी, वडाळा आरटीओ, बोरीवली उपप्रादेशिक आरटीओतंर्गत ८७९ रिक्षांचे, ठाणे विभागात २ हजार ६८७, पुणे विभागात २ हजार १३0 आणि नाशिक विभागात २ हजार ६४६ रिक्षांच्या परवान्यांचे नूतनीकरण झाले. तर राज्यातील अन्य विभागात यापेक्षाही फार कमी प्रतिसाद मिळाला आहे. ३१ आॅक्टोबरपासून नूतनीकरणास सुरुवातनूतनीकरणासाठी विविध परिवहन प्राधिकरणांनी लागू केलेली सहमत शुल्काची रक्कम आॅटोरिक्षा परवानाधारक भरू शकले नाही. राज्यातील विविध परिवहन प्राधिकरणांनी प्रमाणपत्र नूतनीकरणाबाबत घेतलेल्या निर्णयांमध्ये मोठ्या प्रमाणात असमानता असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे सहमत शुल्काची रक्कम वाजवी आकारुन परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. यात सहमत शुल्काची कमाल मर्यादा ३१ आॅक्टोबर २0१५ पर्यंत लागू राहील, असे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आणि नूतनीकरणाला सुरुवात केली.परवान्यांचे नूतनीकरण न करणाऱ्या रिक्षांवर कारवाई सुरू आहे. आता दहा दिवस शिल्लक असून किती प्रतिसाद मिळतो हे पाहूनच पुढील निर्णय घेण्यात येईल. - सतीश सहस्रबुद्धे, अपर परिवहन आयुक्त