शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
5
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
6
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
7
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
8
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
9
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
10
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
11
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
12
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
13
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
14
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
15
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
16
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
17
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
18
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
19
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
20
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट

परवाने नूतनीकरणाला थंड प्रतिसाद

By admin | Updated: November 21, 2015 02:54 IST

नूतनीकरण न करणाऱ्यांचे परवाने कायमचे रद्द केले जातील, असा कठोर इशारा परिवहन विभागाने देऊनही त्याकडे रिक्षा चालकांनी दुर्लक्षच केल्याचे चित्र आहे. राज्यातील १ लाख

मुंबई : नूतनीकरण न करणाऱ्यांचे परवाने कायमचे रद्द केले जातील, असा कठोर इशारा परिवहन विभागाने देऊनही त्याकडे रिक्षा चालकांनी दुर्लक्षच केल्याचे चित्र आहे. राज्यातील १ लाख ४0 हजार ६५ पैकी अवघ्या १५ हजार रिक्षांच्या परवान्यांचे नूतनीकरण झाले असून परिवहन विभागावरच नामुष्कीची वेळ आली आहे. नूतनीकरणासाठी अवघे दहा दिवस शिल्लक असून परिवहन विभाग आता कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. राज्यातील १ लाख ४0 हजार ६५ रिक्षांचे परवाने विविध कारणास्तव रद्द झाले होते. अशा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय १ आॅक्टोबर रोजी घेण्यात आला आणि ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली. त्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये २0 हजार आणि इतर क्षेत्रामध्ये १५ हजार सहमत शुल्क लागू करण्याबाबत सर्व परिवहन प्राधिकरणांना निर्देश देण्यात आले. नूतनीकरणाला थंड प्रतिसाद मिळाल्याने रिक्षा या प्रक्रियेसाठी १६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आणि नूतनीकरण न केल्यास परवाने कायमचे रद्द केले जातील, असा कठोर इशाराही दिला. दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे ३0 नोव्हेंबरपर्यंत नूतनीकरणाची मुदत वाढवण्यात आली. नूतनीकरण करण्यात आलेल्या परवान्यांमध्ये सर्वाधिक मुंबईतील अंधेरी, वडाळा आरटीओ, बोरीवली उपप्रादेशिक आरटीओतंर्गत ८७९ रिक्षांचे, ठाणे विभागात २ हजार ६८७, पुणे विभागात २ हजार १३0 आणि नाशिक विभागात २ हजार ६४६ रिक्षांच्या परवान्यांचे नूतनीकरण झाले. तर राज्यातील अन्य विभागात यापेक्षाही फार कमी प्रतिसाद मिळाला आहे. ३१ आॅक्टोबरपासून नूतनीकरणास सुरुवातनूतनीकरणासाठी विविध परिवहन प्राधिकरणांनी लागू केलेली सहमत शुल्काची रक्कम आॅटोरिक्षा परवानाधारक भरू शकले नाही. राज्यातील विविध परिवहन प्राधिकरणांनी प्रमाणपत्र नूतनीकरणाबाबत घेतलेल्या निर्णयांमध्ये मोठ्या प्रमाणात असमानता असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे सहमत शुल्काची रक्कम वाजवी आकारुन परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. यात सहमत शुल्काची कमाल मर्यादा ३१ आॅक्टोबर २0१५ पर्यंत लागू राहील, असे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आणि नूतनीकरणाला सुरुवात केली.परवान्यांचे नूतनीकरण न करणाऱ्या रिक्षांवर कारवाई सुरू आहे. आता दहा दिवस शिल्लक असून किती प्रतिसाद मिळतो हे पाहूनच पुढील निर्णय घेण्यात येईल. - सतीश सहस्रबुद्धे, अपर परिवहन आयुक्त