शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

थंडीचा द्राक्षबागांना फटका

By admin | Updated: January 25, 2016 02:08 IST

पश्‍चिम वर्‍हाडातील जवळपास १५0 हेक्टरवरील द्राक्षांची फुगवण क्षमता मंदावली आहे.

हर्षनंदन वाघ/बुलडाणा : गत काही दिवसापासून थंडीचा तडाखा वाढल्यामुळे द्राक्ष बागांना फटका बसला असून पश्‍चिम वर्‍हाडातील जवळपास १५0 हेक्टरवरील द्राक्षांची फुगवण क्षमता मंदावली आहे. त्यामुळे यावर्षी द्राक्ष बागायतदार शेतकर्‍यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. पश्‍चिम वर्‍हाडात काही प्रयोगशिल शेतकरी द्राक्षबागांची लागवड करतात. यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात जवळपास १३0 हेक्टर व वाशिम जिल्ह्यात ३0 हेक्टरवर द्राक्षांची लागवड करण्यात आली आहे. द्राक्ष बागा जगविण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत असून पाणीटंचाईचा काळात बाग जगविणे एक कसरत असते. अशाही परिस्थितीत अनेक शेतकर्‍यांनी द्राक्षबागा जगविल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसापासून थंडीचा तडाखा वाढला असून अनेक ठिकाणी सामान्य तापमान ७ डिग्रीने खाली घसरत असून काही ठिकाणी तापमान ५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरत आहे. त्यामुळे द्राक्षवेलींच्या मुळ्े व पेशींची अन्नधारण व वहनक्षमता बंद पडते. त्याचा परिणाम द्राक्षघडापर्यंत होतो. पुरेसा अन्नसाठा फुगवणीच्या स्टेजपर्यंत न गेल्याने द्राक्षमण्यांचा आकार खुंटत आहे. परिपक्व झालेल्या घडांच्या देठांवर, पानांवर कडाक्याच्या थंडीमुळे दवबिंदू थांबून देठ, पाने काळे पडण्याचा धोका वाढला आहे. परिपक्व द्रासघडांतील मणी उन्हाची तीव्रता वाढत गेल्यावर तडकलेले दिसतात. त्यामुळे ग्राहक असे द्राक्ष घेण्यास नकार देतात. परिणामी यावर्षी द्राक्षबाग शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीचा फटका बसणार आहे. हवामानातील पारा घसरत असल्यामुळे द्राक्षबागांच्या फुगवणीवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. बोचरी थंडी वाढल्यामुळे द्राक्षमण्यांना तडे जाण्याचा धोका वाढला आहे.