शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

दोषारोपसिद्धीकरिता आचारसंहिता

By admin | Updated: May 6, 2015 04:43 IST

हखात्याने दोषारोपपत्र दाखल करणो, न्यायालयात दोषारोपसिद्ध होणो, याकरिता पोलिसांना आचारसंहिता घालून दिली असून दोषारोप गुणवत्ता तपासणीकरिता द्विस्तरीय मध्यवर्ती संनियंत्रण समिती स्थापन केली आहे.

पोलीस अधिका:यांवर वचक : सबळ पुरावे नसताना दोषारोपपत्र सादर करणा:यांना चाप
 
नारायण जाधव,  ठाणे
विविध दाखल गुनत संबंधित आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आणि त्यात दोषारोपसिद्धीत राज्यातील पोलीस यंत्रणा खूप मागे आहे. ब-याचवेळा आरोपींचा बचाव करण्याच्या आरोपापायी किंवा टीका टाळण्यासाठी पोलिसांकडून सबळ पुरावे नसतानाही न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाते. 
मात्र ते कायद्याच्या कसोटीस उतरत नसल्याने अनेक गुनंत आरोपी निदरेष सुटतात. यामुळे गृहखात्याची नाहक बदनामी होते. यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी गृहखात्याने दोषारोपपत्र दाखल करणो, न्यायालयात दोषारोपसिद्ध होणो, याकरिता पोलिसांना आचारसंहिता घालून दिली असून दोषारोप गुणवत्ता तपासणीकरिता द्विस्तरीय मध्यवर्ती संनियंत्रण समिती स्थापन केली आहे. यानुसार न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रंपैकी कमीतकमी 5क् टक्के प्रकरणात दोषारोपसिद्धी झालीच पाहिजे, याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, असा दंडक गृहखात्याने आपल्या नव्या आदेशात घालून दिला आहे. 
ही समिती विविध गुनंतील आरोपींविरोधात दोषारोप सादर करण्याआधी तपास अधिका:यांनी गोळा केलेले पुरावे, कागदपत्रे, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचे अहवाल यांची तपासणी करून आपला अभिप्राय देणार आहेत. त्यानंतरच संबंधित तपास अधिका:याने दोषारोपपत्र सादर करावे, असे बजाविण्यात आले असून त्यात आरोपी निदरेष सुटल्यास त्याची नोंद संबंधित अधिका:याच्या गोपनीय अहवालात करावी. यानुसार न्यायदंडाधिकारी न्यायालयाकरिता पोलीस अधीक्षक, सहाय्यक संचालक, तपास अधिकारी तर सत्र न्यायालयाकरिता पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपायुक्तांचा प्रतिनिधी यांची समिती आहे. 
 
गुन्ह्यांची पुन्हा स्वतंत्र यादी
या आदेशानुसार पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्तांनी आपल्या अधिपत्याखालील विविध पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा आढावा घेऊन ज्या गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल नाही, त्यांची स्वतंत्र यादी तयार करावी. उपलब्ध पुराव्याने कायद्याच्या कसोटीवर तग धरू शकतील, अशा गुन्ह्यांची पुन्हा स्वतंत्र यादी करून ती संनियंत्रण समितीकडे पाठवावी. 
 
हे करताना न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या आधारे जास्तीतजास्त शास्त्रोक्त पुरावे गोळा करावेत, असे बजावले आहे. तसेच ज्या गुनंमध्ये योग्य तो कायदेशीर शास्त्रीय पुरावा मिळत नाहीत, त्यांची स्वतंत्र यादी तयार करून योग्य कारणमीमांसा करून त्याबाबत संनियंत्रण समितीची शिफारस घेऊन, अशा प्रकरणात दोषारोपपत्र सादर करू नयेत.