शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

निवडणुकीपूर्वीच कर्मचाऱ्यांना आचारसंहिता

By admin | Updated: September 10, 2014 00:45 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजाला शिस्त लावतानाच कामाच्या वेळेत कार्यालयात अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रतिबंध लावण्यासाठी सोमवार १५ सप्टेबरपासून कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक

जिल्हाधिकारी कार्यालय: बायोमेट्रिक नोंद सक्तीचीनागपूर: जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजाला शिस्त लावतानाच कामाच्या वेळेत कार्यालयात अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रतिबंध लावण्यासाठी सोमवार १५ सप्टेबरपासून कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या शिवाय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे नाव व पदनामाची पाटीही लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.जे कर्मचारी किंवा अधिकारी बायोमेट्रिकमध्ये नोंद करणार नाही त्यांना गैरहजर समजून त्या दिवसाचे वेतन व भत्ते दिले जाणार नाही, असे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट केले आहे.मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालयातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काही अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत त्यांच्या विभागात अनुपस्थित राहात असल्याच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना तेथील विविध विभागांची माहिती नसते. त्यामुळे त्यांना संपूर्ण कार्यालयात भटकंती केल्याशिवाय पर्याय नसतो. अनेकदा त्यांना चुकीची माहिती दिली जाते. नागरिकांचा हा त्रास वाचविण्यासाठी विभाग प्रमुखांनी त्यांच्या नावाचा व पदनामाचा नाम फलक दर्शनी भागात लावावा. त्याच प्रमाणे प्रत्येक शाखेत रोज होणाऱ्या कामाची माहिती जनतेला माहिती व्हावी यासाठी नागरिकांची सनद लावण्यात यावी व त्याची एक प्रत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना द्यावी, त्याच प्रमाणे ती संकेतस्थळावरही टाकण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणाऱ्या फाईल्सवर संकलन क्रमांक नोंद करणे, त्याच प्रमाणे फाईलची बांधणी योग्य पद्धतीने करणे, निपटारा झालेल्या फाईल्सच्या नोंदी करून त्या ३० नोव्हेबरपर्यत अभिलेखा कार्यालयात जमा करण्यास सांगण्यात आले आहे. संगणकाचा वापर करताना वेगवेगळे फॉन्ट्स वापरले जातात. त्यात साम्यता येण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी युनिकोड वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)