शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीपूर्वीच कर्मचाऱ्यांना आचारसंहिता

By admin | Updated: September 10, 2014 00:45 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजाला शिस्त लावतानाच कामाच्या वेळेत कार्यालयात अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रतिबंध लावण्यासाठी सोमवार १५ सप्टेबरपासून कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक

जिल्हाधिकारी कार्यालय: बायोमेट्रिक नोंद सक्तीचीनागपूर: जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजाला शिस्त लावतानाच कामाच्या वेळेत कार्यालयात अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रतिबंध लावण्यासाठी सोमवार १५ सप्टेबरपासून कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या शिवाय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे नाव व पदनामाची पाटीही लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.जे कर्मचारी किंवा अधिकारी बायोमेट्रिकमध्ये नोंद करणार नाही त्यांना गैरहजर समजून त्या दिवसाचे वेतन व भत्ते दिले जाणार नाही, असे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट केले आहे.मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालयातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काही अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत त्यांच्या विभागात अनुपस्थित राहात असल्याच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना तेथील विविध विभागांची माहिती नसते. त्यामुळे त्यांना संपूर्ण कार्यालयात भटकंती केल्याशिवाय पर्याय नसतो. अनेकदा त्यांना चुकीची माहिती दिली जाते. नागरिकांचा हा त्रास वाचविण्यासाठी विभाग प्रमुखांनी त्यांच्या नावाचा व पदनामाचा नाम फलक दर्शनी भागात लावावा. त्याच प्रमाणे प्रत्येक शाखेत रोज होणाऱ्या कामाची माहिती जनतेला माहिती व्हावी यासाठी नागरिकांची सनद लावण्यात यावी व त्याची एक प्रत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना द्यावी, त्याच प्रमाणे ती संकेतस्थळावरही टाकण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणाऱ्या फाईल्सवर संकलन क्रमांक नोंद करणे, त्याच प्रमाणे फाईलची बांधणी योग्य पद्धतीने करणे, निपटारा झालेल्या फाईल्सच्या नोंदी करून त्या ३० नोव्हेबरपर्यत अभिलेखा कार्यालयात जमा करण्यास सांगण्यात आले आहे. संगणकाचा वापर करताना वेगवेगळे फॉन्ट्स वापरले जातात. त्यात साम्यता येण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी युनिकोड वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)