शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता समिती स्थापन करणार

By admin | Updated: October 20, 2014 22:28 IST

वारकरी चिंतन बैठक : सोळा कमली कार्यक्रमाचा प्रमुखांचा निर्णय

महाबळेश्वर : वारकरी संप्रदायातील अनिष्ठ रुढी परंपरा संपविण्यासाठी आवश्यक ती आचारसंहिता ठरविण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. हा निर्णय महाबळेश्वर येथे शुक्रवारी पार पडलेल्या राजस्तरीय चिंतन बैठकीत घेण्यात आला. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वरला बैठक झाली. यावेळी वैश्विक बंधुतेचा व मानवतेचा विचार मांडणाऱ्या संप्रदायाचा सामुदायिक चेहरा जगासमोर आणण्यासाठी दिशा ठरविण्यात आली. संप्रदायाला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबरोबरच श्रीक्षेत्र पंढरपूरसह तीर्थक्षेत्रे व पालखीमार्ग व विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष बद्रनाथ महाराज तनपुरे, पंढरपूर, देहूफड प्रमुख बापूसाहेब महाराज देहूकर, डॉ. शिवाजीराव मोहिते, आळंदी, ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे अध्यक्ष भानुदास महाराज ढवळीकर, माधव महाराज शिवणीकर, निवृत्ती महाराज नामदास, पंढरपूर, बाळासाहेब आरफळकर, श्यामसुंदर महाराज सोन्नर, मुंबई, मुरलीधर पाटील, त्र्यंबकेश्वर, दामोदर महाराज गावले, नाशिक, डॉ. कैलास इंगळे, औरंगाबाद, मारुती महाराज कोकाटे, पुणे, एकनाथ महाराज हंडे, संजय महाराज देहूकर, जगन्नाथ महाराज देशमुख, भागवत महाराज चवरे, भागवत महाराज कबीर, श्यामसुंदर महाराज उखळीकर, पंडित महाराज ठाकूर, पंढरपूर, मदन महाराज कदम, सातारा, महादेवबुवा शहाबाजकर, मुंबई, रवींद्र महाराज हरणे, जळगाव, गजानन महाराज गायकवाड बुलढाणा, नामदेव चव्हाण, पंडित महाराज क्षीरसागर यांच्यासह राज्यभरातील वारकरी, पदाधिकारी उपस्थित होते.कीर्तनकारांनी समाजसुधारणेचे भान ठेवले पाहिजे. कीर्तनकारांनी सामाजिक प्रश्नांवर आसूड ओढले पाहिजेत. हस्याचार्य, विनोदाचार्य, विनोदसम्राट या उपाधी कीर्तनकारांना शोभत नाहीत. त्यामुळे संप्रदायाची चेष्ठा होते. जगाच्या संघर्षात संप्रदाय कोठे आहे, तो कोठे नेला पाहिजे. याचा विचार करून आपापसात कोणताही भेद न ठेवता विश्वबंधुत्वाचा व मानवतेचा विचार पुढे नेला पाहिजे, असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे सातत्य ठेवणे, जगभर संप्रदायाचा प्रसार करणे, पुणे व मुंबईत अभ्यास केंद्र सुरू करणे, पंढरपूर, आळंदी, पैठण व त्र्यंबकेश्वर येथे स्वच्छतागृहासाठी शंभर टक्के अनुदान मिळविणे, चंद्रभागा तिरी घाट बांधणे व थिम पार्कची उभारणे करणे, वारकरी शाळांना अनुदान मंजूर करणे हा वारकरी साहित्य परिषदेने आखलेल्या सोळा कलमी कार्यक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. याची अंमलबजावणी करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.महाबळेश्वर येथे राज्याच्या विविध भागातील किर्तनकार, प्रवचनकार तसेच या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)