शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता समिती स्थापन करणार

By admin | Updated: October 20, 2014 22:28 IST

वारकरी चिंतन बैठक : सोळा कमली कार्यक्रमाचा प्रमुखांचा निर्णय

महाबळेश्वर : वारकरी संप्रदायातील अनिष्ठ रुढी परंपरा संपविण्यासाठी आवश्यक ती आचारसंहिता ठरविण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. हा निर्णय महाबळेश्वर येथे शुक्रवारी पार पडलेल्या राजस्तरीय चिंतन बैठकीत घेण्यात आला. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वरला बैठक झाली. यावेळी वैश्विक बंधुतेचा व मानवतेचा विचार मांडणाऱ्या संप्रदायाचा सामुदायिक चेहरा जगासमोर आणण्यासाठी दिशा ठरविण्यात आली. संप्रदायाला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबरोबरच श्रीक्षेत्र पंढरपूरसह तीर्थक्षेत्रे व पालखीमार्ग व विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष बद्रनाथ महाराज तनपुरे, पंढरपूर, देहूफड प्रमुख बापूसाहेब महाराज देहूकर, डॉ. शिवाजीराव मोहिते, आळंदी, ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे अध्यक्ष भानुदास महाराज ढवळीकर, माधव महाराज शिवणीकर, निवृत्ती महाराज नामदास, पंढरपूर, बाळासाहेब आरफळकर, श्यामसुंदर महाराज सोन्नर, मुंबई, मुरलीधर पाटील, त्र्यंबकेश्वर, दामोदर महाराज गावले, नाशिक, डॉ. कैलास इंगळे, औरंगाबाद, मारुती महाराज कोकाटे, पुणे, एकनाथ महाराज हंडे, संजय महाराज देहूकर, जगन्नाथ महाराज देशमुख, भागवत महाराज चवरे, भागवत महाराज कबीर, श्यामसुंदर महाराज उखळीकर, पंडित महाराज ठाकूर, पंढरपूर, मदन महाराज कदम, सातारा, महादेवबुवा शहाबाजकर, मुंबई, रवींद्र महाराज हरणे, जळगाव, गजानन महाराज गायकवाड बुलढाणा, नामदेव चव्हाण, पंडित महाराज क्षीरसागर यांच्यासह राज्यभरातील वारकरी, पदाधिकारी उपस्थित होते.कीर्तनकारांनी समाजसुधारणेचे भान ठेवले पाहिजे. कीर्तनकारांनी सामाजिक प्रश्नांवर आसूड ओढले पाहिजेत. हस्याचार्य, विनोदाचार्य, विनोदसम्राट या उपाधी कीर्तनकारांना शोभत नाहीत. त्यामुळे संप्रदायाची चेष्ठा होते. जगाच्या संघर्षात संप्रदाय कोठे आहे, तो कोठे नेला पाहिजे. याचा विचार करून आपापसात कोणताही भेद न ठेवता विश्वबंधुत्वाचा व मानवतेचा विचार पुढे नेला पाहिजे, असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे सातत्य ठेवणे, जगभर संप्रदायाचा प्रसार करणे, पुणे व मुंबईत अभ्यास केंद्र सुरू करणे, पंढरपूर, आळंदी, पैठण व त्र्यंबकेश्वर येथे स्वच्छतागृहासाठी शंभर टक्के अनुदान मिळविणे, चंद्रभागा तिरी घाट बांधणे व थिम पार्कची उभारणे करणे, वारकरी शाळांना अनुदान मंजूर करणे हा वारकरी साहित्य परिषदेने आखलेल्या सोळा कलमी कार्यक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. याची अंमलबजावणी करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.महाबळेश्वर येथे राज्याच्या विविध भागातील किर्तनकार, प्रवचनकार तसेच या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)