शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
2
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
3
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
4
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
5
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
6
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
7
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
8
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
9
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
10
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका
11
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
12
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
13
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
14
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
15
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
16
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
17
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
18
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
19
IND vs WI : बुमराहचा 'ट्रिपल फिफ्टी'चा रेकॉर्ड; वेळ घेतला; पण परफेक्ट यॉर्करसह साधला विकेटचा डाव
20
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा

कोकणची वाईन उद्योजकांच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: January 16, 2015 23:44 IST

सात वर्षे फॉर्म्युले पडूनच : कोकणातील आंबा, करवंद, जांभळावरील वायनरी संकटात

रत्नागिरी : कोकणात आंबा, काजू, करवंद, कोकम, चिकू, फणस या फळांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, प्रक्रियेअभावी लाखो टन फळे वाया जातात. हे लक्षात आल्यानंतर तत्कालीन कुलगुरु डॉ. विजय मेहता यांनी वायनरी संशोधन प्रकल्पाला मंजुरी दिली व द्राक्षाच्या धर्तीवर या फळांपासून वाईन तयार करण्यात शास्त्रज्ञांना यशही आले. मात्र, विद्यापीठाने तयार केलेल्या वाईन प्रकल्पाला ७ वर्षे उद्योजकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने कृषी विद्यापीठाच्या वाईन निर्मितीला राजमार्ग मिळालेला नाही.२००७ साली या प्रकल्पातून २२ लाख रुपये खर्चून वाईन निर्माण केली गेली. लाखो टन वाया जाणाऱ्या काजूबोंडांपासून वाईन निर्माण करण्याचा निर्णय विद्यापीठस्तरावर घेण्यात आला. उद्यान विद्या विभागप्रमुख डॉ. पराग हळदणकर यांनी हा प्रस्ताव मेहता यांच्याकडे मांडला. त्यांनी हिरवा कंदील दाखवताच हळदणकर, राजेंद्र आग्रे, गिरेश चव्हाण यांनी संशोधनाला सुरुवात केली. विद्यापीठाचा वाईनरी प्रकल्प प्रायोगिकतत्त्वावर सुरु झाला. काजूबोंडांपासून वाईन बनवण्याचा नाशिक येथील टेस्टिंग लॅबचे रिपोर्ट उत्कृ ष्ट आल्यानंतर करवंदापासून वाईन बनवून करंवदाला फळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले. हा प्रयोगही यशस्वी झाला. जांभूळ, कच्चा आंबा, पिका आंबा अशा फळांची वाईन बनविण्यात विद्यापीठाला यश आले. संयुक्त संशोधन समितीने या प्रकल्पाला मान्यताही दिली आहे. डॉ. सी. डी. पवार, डॉ. प्रभूदेसाई, एस. जी. कस्तुरे, जीवन कदम या शास्त्रज्ञांनी वाईनचा प्रयोग यशस्वी केला आहे. विस्तार संशोधन संचालक डॉ. उत्तमकुमार महाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरु आहे.विद्यापीठाच्या वायनरी प्रकल्पाला शेतकरी उद्योजक यांनी भेट देऊन संशोधन समजून घेण्यासाठी विद्यापीठ स्तरावर प्रयत्न सुरु असले तरी गेल्या सात वर्षात एकही उद्योजक विद्यापीठाच्या वाईनचा प्रकल्प स्वीकारायला तयार नाही. ही वस्तुस्थिती आहे. शास्त्रज्ञांकडून यासंदर्भातील तांत्रिक माहिती पुरविली जाणार आहे. विद्यापीठाचे शास्त्रज्ञ फळप्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी म्हणून प्रयत्न करीत असले तरी शेतकरी व उद्योजक मात्र वायनरी प्रकल्पाबाबत उदासीन असल्याचे समोर येत आहे.द्राक्षापासून वाईन त्याबरोबरच फळांपासून वाईन निर्मितीचा प्रयत्न केला जात असताना विद्यापीठ स्तरातील शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयत्नांना उद्योजकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यापीठाचा हा प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाही. (प्रतिनिधी)