शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘घर तेथे नारळाचे झाड’!

By admin | Updated: April 10, 2017 03:23 IST

भूम तालुक्यातील वांगी येथील ग्रामस्थांनी वृक्ष लागवडीचा निर्धार करून ‘घर तेथे नारळाचे झाड’ ही संकल्पना सत्यात

बाबूराव चव्हाण /उस्मानाबादभूम तालुक्यातील वांगी येथील ग्रामस्थांनी वृक्ष लागवडीचा निर्धार करून ‘घर तेथे नारळाचे झाड’ ही संकल्पना सत्यात उतरविली. ग्रामस्थांनी या उपक्रमाला खंड पडू न दिल्याने गावातील वृक्षांची संख्या आता कुटुंबसंख्येच्या तिप्पट झाली आहे. त्यामुळे ४११ कुटुंबसंख्या असलेल्या या गावाने अक्षरश: हिरवा शालू पांघरला आहे. भूम शहरापासून अवघ्या वीस किमी अंतरावर वांगी हे गाव आहे. गावाची लोकसंख्या सव्वादोन हजाराच्या घरात आहे. साधारपणे साडेतीन वर्षांपूर्वी गावामध्ये  फारसे वृक्ष नसल्याने गावाला एकप्रकारे उजाड स्वरूप आले होते. हे चित्र बदलण्याचा निर्धार वांगी ग्रामपंचायतीने केला. प्रत्येक घरासमोर नारळाचे झाड लावण्याचा निर्णय घेऊन युद्धपातळीवर अंमलबजावणीही केली. कुठलेही अनुदान अथवा मदतीची अपेक्षा न  करता ग्रामस्थांनी आपापल्या घरासमोर नारळाची झाडे लावली आणि  ती जोपासलीही. एवढ्यावरच न थांबता ग्रामस्थांनी गावाकडे येणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याचा निश्चय केला आणि तो प्रत्यक्षातही उतरविला. रस्त्याच्या दुतर्फा विविध फळे, फुले आणि शोभेच्या झाडांची लागवड केली. घरासमोर लावलेल्या झाडांना पाणी घालण्याची जबाबदारी त्या-त्या कुटुंबांनी उचलली. परंतु, रस्त्यांच्या दुतर्फा लावलेल्या झाडांना पाणी कोण घालणार, असा प्रश्न जेव्हा  निर्माण झाल्यानंतर ग्रामपंचायतीने पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन  पद्धती अवलंबिली. तसेच झाडांच्या संरक्षणासाठी ‘ट्री गार्ड’ बसविले  असून आज जवळपास सर्वच रस्ते  गर्द झाडीने नटले आहेत. त्यामुळे  पूर्वी भकास दिसणारे गाव  आज अक्षरश: झाडांच्या गर्तेत हरवून गेले आहे.  विविध पुरस्कारांवर कोरले नावरस्ते, सांडपाण्याचे व्यवस्थापन, नाल्या-शौचालयाचे बांधकाम आदी कामांच्या जोरावरच ग्रामपंचायतीने विविध पुरस्कारांवर नाव कोरले आहे. २०११-१२मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. पर्यावरण संतुलित ग्राम योजनेअंतर्गत सलग तीन वर्ष हे गाव पात्र ठरले. निर्मल ग्राम पुरस्कारही पटकाविला. एवढेच नाहीतर, ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ मानांकनही मिळाले आहे.  सौरऊर्जेने उजळले गाव विद्युत भारनियमन आणि वीजबिलांच्या कटकटीतून सुटका व्हावी, यासाठी ग्रामपंचायतीने सौरऊर्जेची कास धरली आहे. गावांतील प्रमुख रस्ते, चौक, मंदिर परिसर, ग्रामपंचायत प्रांगण आदी ठिकाणी सौरदिवे बसविण्यात आले आहेत. येणाऱ्या काळातही सौरऊर्जेचा अधिकाअधिक वापर वाढविणार असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.