शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
2
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
3
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
4
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
5
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
6
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
7
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
8
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
9
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
10
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
11
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
12
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
13
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
14
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
15
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
16
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
17
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
18
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
19
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
20
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी

‘घर तेथे नारळाचे झाड’!

By admin | Updated: April 10, 2017 03:23 IST

भूम तालुक्यातील वांगी येथील ग्रामस्थांनी वृक्ष लागवडीचा निर्धार करून ‘घर तेथे नारळाचे झाड’ ही संकल्पना सत्यात

बाबूराव चव्हाण /उस्मानाबादभूम तालुक्यातील वांगी येथील ग्रामस्थांनी वृक्ष लागवडीचा निर्धार करून ‘घर तेथे नारळाचे झाड’ ही संकल्पना सत्यात उतरविली. ग्रामस्थांनी या उपक्रमाला खंड पडू न दिल्याने गावातील वृक्षांची संख्या आता कुटुंबसंख्येच्या तिप्पट झाली आहे. त्यामुळे ४११ कुटुंबसंख्या असलेल्या या गावाने अक्षरश: हिरवा शालू पांघरला आहे. भूम शहरापासून अवघ्या वीस किमी अंतरावर वांगी हे गाव आहे. गावाची लोकसंख्या सव्वादोन हजाराच्या घरात आहे. साधारपणे साडेतीन वर्षांपूर्वी गावामध्ये  फारसे वृक्ष नसल्याने गावाला एकप्रकारे उजाड स्वरूप आले होते. हे चित्र बदलण्याचा निर्धार वांगी ग्रामपंचायतीने केला. प्रत्येक घरासमोर नारळाचे झाड लावण्याचा निर्णय घेऊन युद्धपातळीवर अंमलबजावणीही केली. कुठलेही अनुदान अथवा मदतीची अपेक्षा न  करता ग्रामस्थांनी आपापल्या घरासमोर नारळाची झाडे लावली आणि  ती जोपासलीही. एवढ्यावरच न थांबता ग्रामस्थांनी गावाकडे येणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याचा निश्चय केला आणि तो प्रत्यक्षातही उतरविला. रस्त्याच्या दुतर्फा विविध फळे, फुले आणि शोभेच्या झाडांची लागवड केली. घरासमोर लावलेल्या झाडांना पाणी घालण्याची जबाबदारी त्या-त्या कुटुंबांनी उचलली. परंतु, रस्त्यांच्या दुतर्फा लावलेल्या झाडांना पाणी कोण घालणार, असा प्रश्न जेव्हा  निर्माण झाल्यानंतर ग्रामपंचायतीने पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन  पद्धती अवलंबिली. तसेच झाडांच्या संरक्षणासाठी ‘ट्री गार्ड’ बसविले  असून आज जवळपास सर्वच रस्ते  गर्द झाडीने नटले आहेत. त्यामुळे  पूर्वी भकास दिसणारे गाव  आज अक्षरश: झाडांच्या गर्तेत हरवून गेले आहे.  विविध पुरस्कारांवर कोरले नावरस्ते, सांडपाण्याचे व्यवस्थापन, नाल्या-शौचालयाचे बांधकाम आदी कामांच्या जोरावरच ग्रामपंचायतीने विविध पुरस्कारांवर नाव कोरले आहे. २०११-१२मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. पर्यावरण संतुलित ग्राम योजनेअंतर्गत सलग तीन वर्ष हे गाव पात्र ठरले. निर्मल ग्राम पुरस्कारही पटकाविला. एवढेच नाहीतर, ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ मानांकनही मिळाले आहे.  सौरऊर्जेने उजळले गाव विद्युत भारनियमन आणि वीजबिलांच्या कटकटीतून सुटका व्हावी, यासाठी ग्रामपंचायतीने सौरऊर्जेची कास धरली आहे. गावांतील प्रमुख रस्ते, चौक, मंदिर परिसर, ग्रामपंचायत प्रांगण आदी ठिकाणी सौरदिवे बसविण्यात आले आहेत. येणाऱ्या काळातही सौरऊर्जेचा अधिकाअधिक वापर वाढविणार असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.