शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

किनारपट्टीवर ३५०० सुरक्षा रक्षक

By admin | Updated: January 24, 2015 01:54 IST

संभावीत दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर ३ हजार ५०० सागरी सुरक्षा रक्षक सज्ज करण्यात आले आहेत.

जयंत धुळप - अलिबागसंभावीत दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर ३ हजार ५०० सागरी सुरक्षा रक्षक सज्ज करण्यात आले आहेत. मच्छीमार बांधवांना विश्वासात घेऊन, ‘सागरी रक्षक दलां’ची स्थापना करण्याची संकल्पना पुढे आली. या सागर रक्षक दलांतील सदस्यांना पोलिसांकडून ओळखपत्रे देण्यात आली आहेत. समुद्रात मच्छीमारी करीत असताना तसेच किनारी भागात वावरताना नेमकी कोणती दक्षता घ्यावी, याचे मार्गदर्शन पोलीस, तटरक्षक दल, सीमाशुल्क विभाग, भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी मेळावे आयोजित करून मच्छीमारांना दिली आहे. प्रजासत्ताक दिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर विविध दहशतवादी संघटनांनी दहशतवाद्यांचे चार गट भारतात पाठवले असून, त्यापैकी एक गट मुंबईत आल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर ही सतर्कता घेण्यात आली आहे. रायगडची किनारपट्टी ही संवेदनशील असल्याने मच्छीमारांशी रायगड पोलिसांनी संवाद व संपर्क जाणीवपूर्वक वृद्धिंगत करून ही सागर रक्षक व्यवस्था निर्माण केल्याची माहिती रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी दिली. च्कोकणातील किनारपट्टीतील सागरी सुरक्षा यंत्रणा सक्षम झाली असल्याची माहिती कोकण परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. सागरी गस्तीकरीता पोलीस दलास देण्यात आलेल्या स्पिÞड बोट्स, नव्याने कार्यान्वित झालीली सागरी पोलीस ठाणी या बरोबरच पोलीस, तटरक्षक दल,नौदल, सिमा शुल्क विभाग आणि मत्स विभाग यांच्या संयुक्त समन्वयातून स्थापन करण्यात आलेली ‘सागर रक्षक दले’ यांच्या माध्यमातून ही सागरी सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात आल्याचे गुप्ता यांनी पूढे सांगीतले. यावेळÞी रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.शशिकांत महावरकर व अप्पर ुिजल्हा पोलीस अधिक्षक राजा पवार हे उपस्थित होते.बल्क एसएमएस सिस्टीम...च्मच्छीमारांच्या मोबाइल्सवर ‘बल्क एसएमएस सिस्टीम’द्वारे संबंधित जिल्हा पोलीस यंत्रणेकडून सातत्याने माहिती देण्यात येते. त्यात समुद्रात वा किनारी भागात कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास हे मच्छीमार तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षास माहिती देत आहेत. अशी माहिती प्राप्त झाल्यावर त्याची तत्काळ खातरजमा तटरक्षक दल व नौदलाच्या गस्तीनौका व हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून करण्यात येते. च्जे सुरक्षा रक्षक ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा वापर करतात त्यांचे स्वतंत्र गट करून त्या प्रभावी माध्यमातूनदेखील थेट माहितीची देवाण-घेवाण करण्याचे काम सध्या रायगडमध्ये सुरू आहे. याव्यतिरिक्त मोबाइलवर एसएमएसद्वारे तर बोटींवरील रेडिओवर मच्छीमार बांधवांना उपयुक्त हवामानाची माहिती देण्यात येत आहे. मोबाइलमुळे समुद्रातील संबंधित सागरी सुरक्षा रक्षकाच्या भौगोलिक स्थानाची अचूक माहिती मिळत असून, आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा तेथे काही क्षणांत पोहोचणेदेखील शक्य होऊ शकेल.सर्वाधिक २ हजार १०० सागरी सुरक्षा रक्षक हे एकट्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मांडवा, रेवदंडा, मुरूड, पेण, दादर, वडखळ, पोयनाड, नागोठणे, महाड शहर, महाड ग्रामीण, गोरेगाव, रोहा, श्रीवर्धन, दिघी व म्हसळा या पोलीस ठाण्यांच्या किनारी भागातील आहेत. रायगडव्यतिरिक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५४ गावांतील ३४४, रत्नागिरीतील १३६ गावांतील ७३७, ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रांत १० गावांतील १३५ तर नव्याने स्थापित पालघर जिल्ह्यात १०० सागरी सुरक्षा रक्षक सज्ज झाले आहेत.