शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

युती सरकार ‘पुरवणी’ बजेटवर

By admin | Updated: December 16, 2015 04:33 IST

पुरवणी मागण्यांवर तत्कालीन आघाडी सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजपा नेत्यांनी, सत्तेवर येताच आघाडी सरकारचा उच्चांक मोडीत काढला. पहिल्याच वर्षात तब्बल ३१ हजार कोटी

- अतुल कुलकर्णी,  नागपूर

पुरवणी मागण्यांवर तत्कालीन आघाडी सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजपा नेत्यांनी, सत्तेवर येताच आघाडी सरकारचा उच्चांक मोडीत काढला. पहिल्याच वर्षात तब्बल ३१ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडून अर्थसंकल्पाला नियोजन शून्यतेचे नवे पान जोडले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने मार्चमध्ये ५४ हजार कोटींचे बजेट मांडले होते. मात्र, त्यानंतर एलबीटी, टोलमाफीसारखे आणि राज्यात पडलेला दुष्काळ, यामुळे सरकारचे बजेट हाताबाहेर गेले. परिणामी, जुलैच्या पावसाळी अधिवेशनात १४,७९३ कोटी आणि आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात १६,०९४ कोटी, असे एकूण ३०,८८७ कोटी २१ लाख ६८ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडून, राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी सावरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ही कसरत करत असताना १७ विभागांच्या मागण्यांवर कोणतीही चर्चा न करता त्या मंजूर केल्या आहेत. आघाडी सरकारच्या काळात २८,३१४ कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या, तेव्हा भाजपाच्या मंडळींनी सरकारवर नियोजन शून्यतेचा आरोप लावला होता, पण काटेकोर नियोजन करतआघाडी सरकारने पुरवणी मागग्या १०,३२४ कोटींवर आणल्या होत्या. मात्र यावर्षी भाजपा सरकारने पूर्वीचे सगळे विक्रम मोडून काढत ३१ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.एलबीटी, टोलमाफीमुळे आधीच सरकारचे महसुली उत्पन्न १२ हजार कोटींनी कमी झाले असताना येत्या वर्षातही महसुली उत्पन्नात घट होण्याचीच चिन्हे आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या मालकीच्या जमिनी विकून आणि भाडे करार संपुष्टात आणून १० ते १२ हजार कोटींचे उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न आहे. परंतु गेल्या वर्षभरात प्रत्यक्षात त्यातून १ रुपयाचेही उत्पन्न मिळालेले नाही. सरकारने एलबीटी रद्द करताना सगळी भिस्त जीएसटीवर ठेवली होती. मात्र त्याविषयीच काही निर्णय न झाल्याने एलबीटीपोटी मिळणाऱ्या १,२२९.९० कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. शिवाय, मागील कर व करेतर महसुलातील ४८ हजार कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात शासनाला पूर्णत: अपयश आले आहे. राज्यावर ३ लाख ५२ हजार कोटींचे कर्ज असून त्याच्या व्याजापोटी वर्षाला २७ हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. परिणामी यावर्षीही १० ते १२ हजार कोटींची तूट होईल, असे चित्र आहे. वित्तमंत्री म्हणाले...यावर्षी आम्ही ७०:२०:१० हे सूत्र स्वीकारले होते. मार्चमध्ये ७० टक्के, जुलैच्या अधिवेशनात २० टक्के आणि डिसेंबरमध्ये १० टक्के असे बजेट देण्याचे धोरण मान्य केले होते. नीती आयोगाने ६०:४० असे सूत्र मान्य केल्याने, प्रत्येक योजनेत राज्याचा ६० टक्के व केंद्राचा ४० टक्के वाटा झाला. शिवाय, दुष्काळामुळे अचानक ४ हजार कोटींचा बोझा पडला. यामुळे पुरवणी मागण्या वाढल्या. मात्र, येणाऱ्या आर्थिक वर्षात १०० टक्के नियोजन केल्याशिवाय पैसेच दिले जाणार नाहीत, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे म्हणणे आहे.विभागनिहाय मागितलेली रक्कम विभाग... रक्कम (कोटीत)महसूल व वन - ५५०५नगर विकास- २८१६सार्वजनिक बांधकाम- १०३०नियोजन विभाग- ९२०सामाजिक न्याय - ७५२कृषी व पद्म- ५४१गृहविभाग- ४५०जलसंपदा- ४३४अन्न व पुरवठा - ४२४सहकार, पणन, वस्त्रोद्योग- ४०४