शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

युती सरकार म्हणजे भरकटलेले जहाज

By admin | Updated: November 30, 2015 02:54 IST

राज्यातील भाजपा-सेना सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. भूगोलाच्या पेपरमध्ये समाजशास्त्र सोडवायला लागले तर कसे होणार?

चिपळूण : राज्यातील भाजपा-सेना सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. भूगोलाच्या पेपरमध्ये समाजशास्त्र सोडवायला लागले तर कसे होणार? राज्यात शेतकरी वाऱ्यावर आहे. मात्र हे सरकार म्हणजे भरकटलेले जहाज आहे. मुख्यमंत्र्यांच्या शहरात गुन्हेगारी वाढली आहे. कृषीप्रधान राज्यात स्वतंत्र कृषीमंत्री व गृहमंत्री नाही, ही शोकांतिका आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.चिपळूण येथे महाराष्ट्र एस. टी. कामगार प्रतिनिधींच्या हल्लाबोल मेळाव्यासाठी ते येथे आले होते. राज्यात मोठा दुष्काळ पडला आहे. नऊवेळा केंद्रीय पथके आली परंतु, कोणतीही उपाययोजना नाही. जनावरे तडफडत आहेत. कोकणातही बागा होरपळल्या आहेत. फळबागांची उत्पादनक्षमता कमी झाली आहे. त्याची माहिती सरकारकडे नाही. राज्यात तूरडाळीची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या सरकारने २ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्याची जबाबदारी स्वीकारून संबंधित मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, असे ते म्हणाले.शिवसेनेची नौटंकी सुरू आहे. ३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनही त्यांना जाग आली नाही. आता मराठवाड्याचा दौरा ते करत आहेत. कृषीमंत्र्यांनी दुष्काळी भागाचा अद्याप दौरा केलेला नाही, याकडे विखे यांनी लक्ष वेधले. कोकणचे पाणी मुंबईला नेण्याची गरज नाही. ठाणे व नाशिकमधून पाणी नेण्याची मान्यता आहे. चितळे समितीने सुचविलेले बंधारे बांधले तरी मुंबईचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)